शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देणार

By admin | Updated: November 26, 2014 02:02 IST

रोजगाराभिमुख शिक्षणाअभावी राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे राज्यातील उद्योगांना अनुकूल असे प्रशिक्षित युवक मिळत नाहीत.

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती समारोह
यवतमाळ : रोजगाराभिमुख शिक्षणाअभावी राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे राज्यातील उद्योगांना अनुकूल असे प्रशिक्षित युवक मिळत नाहीत. हा विरोधाभास दूर करण्यासाठी राज्यात रोजगाराभिमुख शिक्षणावर अधिक लक्ष देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या 17व्या स्मृतिदिनानिमित्त यवतमाळ येथील प्रेरणास्थळावर आयोजित ‘व्हिजन महाराष्ट्र’ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा होते. प्रमुख पाहुणो म्हणून 
माजी शालेय शिक्षणमंत्री तथा लोकमतचे एडिटर-इन-चिफ राजेंद्र दर्डा होते. 
मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 1क् 
कोटी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय 
घेतला आहे. महाराष्ट्रातील एक कोटी युवकांना एखाद्या विशेष 
कौशल्याचे प्रशिक्षण देऊन बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच राज्याच्या शिक्षण पद्धतीत बदल करून तिला व्यावसायिक आणि कला 
क्षेत्रत जागतिक दर्जाची बनविणो आवश्यक आहे. त्यासाठी अध्ययन केले जाईल़
 
विकासाची प्रेरणा घेऊन चाललो
बाबूजी तसेच माङो वडील गंगाधर फडणवीस यांच्यात घनिष्ट मैत्री होती. त्यांच्यात अनेकदा विकासाच्या चर्चा रंगायच्या. वडिलांच्या मृत्यूनंतर बाबूजींनी मला अपार प्रेम दिले. मी  ‘लोकमत’मध्ये जायचो, तेव्हा ते मला बोलवून घेत आणि अनेक विषयांवर चर्चा करीत. त्यांच्याकडून पित्याप्रमाणो प्रेमाचा वर्षाव होई. बाबूजींसोबत माङोही भावबंध जुळले. ‘प्रेरणास्थळ’ या बाबूजींच्या समाधी स्थळावरून मी तळागाळार्पयत विकास पोहोचविण्याची प्रेरणा घेऊन जात आहे, असे फडणवीस म्हणाले.
 
एका कारखान्यासाठी लागतात 76 परवानगी
राज्यात एक कारखाना उभारण्यासाठी उद्योजकांना 76 वेगवेगळ्या विभागांकडून परवानगी मिळवावी लागते. त्यामुळे ते येथे येण्यासाठी उत्सुक नाहीत. यावर तोडगा काढण्यासाठी समिती बनविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली़ सोबतच एक खिडकी योजना लागू करण्याचा विचार असल्याचे सांगून ते म्हणाले की, 1क्क् कोटींहून अधिक गुंतवणूक करणा:या उद्योजकांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल. त्यांच्याकरिता शासनाकडून नोडल अधिका:याची नेमणूक करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली़ 
 
पंचनाम्याची अट रद्द करणार 
19 हजार गावांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या गावांना मदतीसाठी वैयक्तिक पंचनाम्याची अट अडसर ठरत आहे. ही अट शिथिल करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. केंद्रही याबाबत सकारात्मक असून, केवळ तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी आहे. त्यानंतर लगेच ही अट रद्द करण्याबाबतचे आदेश जारी केले जातील. याद्वारे शेतक:यांना थेट मदत देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
 
विजय दर्डा यांनी मांडल्या विदर्भाच्या समस्या
च्खासदार विजय दर्डा यांनी विदर्भ तसेच यवतमाळ जिलच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमक्ष मांडल्या. यवतमाळ जिलत शेतक:यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग यवतमाळ जिलत विकासातील मैलाचा दगड ठरू शकतो. सन 2क्क्8 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले होते आणि तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. यानंतरही मंदगतीने या प्रकल्पाचे काम सुरु आहे.
 
च्विद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री महाराष्ट्राचे आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तर या रेल्वे मार्गाच्या कार्यास गती मिळू शकते, असे दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. याशिवाय रेल्वेउद्यान, यवतमाळच्या विमानतळाचा विस्तार, यवतमाळचे उद्योग,  मिहान, ऑटो हब आणि शेतक:यांच्या समस्याही त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
 
विदर्भाला न्याय देण्याची संधी : विकासाचे लक्ष्य समोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी कधीही कोणता भेदभाव केलेला नाही. त्यांच्या पित्याकडून त्यांनी ही शिकवण आत्मसात केली आहे. यासाठी पत्नी अमृता यांनीही त्यांना शक्ती दिली आहे. विदर्भावर कायम अन्याय होत आला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या रूपात युवा नेतृत्व लाभल्याने विदर्भाला एक संधी मिळाली आहे. देवेंद्र यांच्या नावातच शक्ती आहे. याचमुळे युवांची संपूर्ण भिस्त मुख्यमंत्र्यांवर आहे, असे विजय दर्डा म्हणाले.