शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

हा महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, मानवी चुकांबरोबरच प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत

By वसंत भोसले | Updated: August 11, 2019 05:47 IST

दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलयंकारी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाही प्रामुख्याने कारणीभूत आहेत.

- वसंत भोसलेकोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलयंकारी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाही प्रामुख्याने कारणीभूत आहेत. त्यामुळे शासन, प्रशासन आणि जनतेला हात वर करून केवळ निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. याउलट मानवाच्या असंख्य चुका निसर्गाने वारंवार दाखवून देऊनही त्यात सुधारणा करण्याची कोणाची तयारी नाही. त्याचाच फटका निसर्गाने पुन्हा एकदा दिला आहे, हे स्पष्ट होते आहे.दक्षिण महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर तसेच बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागाला या महापुराचा प्रचंड तडाखा बसला आहे. यापूर्वी १९५३, १९८३ आणि २००५ मध्ये महापुराने असा फटका दिला होता. महाबळेश्वरमध्ये उगम पावणा-या कृष्णा नदीचे हे खोरे आहे. महाबळेश्वर ते कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीजवळील दाजीपूरपर्यंतच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून दोन डझन नद्यांचा उगम होतो. त्यांपैकी बहुतांश नद्यांवर धरणे आहेत. त्यांची साठवण क्षमता सुमारे २१० टीएमसी आहे. या सर्व नद्यांचा संगम होत होत शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे सर्व पाणी जमा होते. तेथून कृष्णा नदी कर्नाटकात जाते.नद्यांच्या पात्रातील वाळू उपसा केल्याने त्यांचे निसर्गचक्रही बिघडले आहे. मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. नद्यांची पात्रे अरुंद झाली आहेत आणि नद्यांच्या पात्रापर्यंत शेतजमिनी तयार करून उसाची शेती नदीकाठापर्यंत करण्यात आली आहे. त्याच्या परिणामामुळे नद्यांच्या पात्रात पाणी कमी आणि उभ्या पिकांमध्ये अधिक अशी अवस्था झाली आहे.नद्यांच्या पूरनियंत्रण रेषेत झालेली बांधकामे, धरणांचे अतिरिक्त पाणी एकाच वेळी सोडावे लागण्याचे संकट, नद्यांच्या रचनांमधील फेरबदल, नद्यांवरून जाणाºया रस्त्यांमुळे अडणारे पाणी आदी मानवी चुकांचा फटका आहे. महापुराची तीव्रता गंभीर करणारी ही कारणे ठरली आहेत. कमी कालावधीत पडणारा मोठा पाऊस, धरणे क्षमतेपेक्षा अधिक भरणे आणि पाणलोट क्षेत्राच्या बाहेर पडणाºया पावसाच्या पाण्याचा समावेश करून घेण्यास जागा नसणे आदी मानवी चुकांचा सर्वाधिक फटका बसत आहे.गतवेळच्या महापुराची तीव्रता, त्याचे परिणाम आणि निर्माण होणारे धोके आजवर रेकॉर्डवर आलेले आहेत. तरीही राज्य प्रशासनाची यंत्रणा तत्परतेने काळजी घेत नाही हीदेखील मानवी चूकच आहे. सांगलीजवळील ब्रह्मनाळची घटना हे त्याचे ताजे उदाहरण आहे. क-हाड ते सांगलीपर्यंत किती पाणीपातळी कोठे आली, तर कोणती गावे संकटात येतात, याचे गणित मांडावे असे आहे. २००५च्या पुरातही ब्रह्मनाळ गाव पाण्याने वेढले गेले होते. या गावाला सर्वप्रथम हलविण्याची गरज आहे. त्यासाठी एनडीआरएफ किंवा लष्कराला पाचारण केले पाहिजे. हरिपूर या गावची हीच कहाणी आहे. तेथे तर नदीच्या काठावरच बंगले बांधले गेले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात पूर आल्यावर आंबेवाडी, प्रयाग चिखलीसारखी गावे सर्वप्रथम पाण्याने वेढली जातात. पडणारा पाऊस, भरलेली धरणे, त्यातून सोडण्यात येणारे पाणी तसेच कोल्हापूर आणि सांगलीचा कोणता भाग पाण्याखाली जाणार, हे गणिताप्रमाणे मांडता येऊ शकते; पण हे सर्व रेकॉर्ड, नकाशे तयार कोठे आहेत? ही प्रशासनाची म्हणजे मानवाची चूक आहे. ब्रह्मनाळचे बळी त्याचे आहेत, निसर्गाने घेतलेले नाहीत.‘अलमट्टी’ची चर्चा ही केवळ फसवाफसवीकर्नाटकातील बागलकोटजवळ कृष्णा नदीवर असलेल्या अलमट्टी धरणामुळे फुगवटा येतो. परिणामी, महाराष्ट्रातील नद्यांची पातळी वाढते, अशी चर्चा राजकारणी मंडळी करून लोकांची दिशाभूल करतात. महाराष्ट्रातून साडेतीन लाख क्युसेक्स पाण्याची आवक अलमट्टी धरणात होत असेल, तर त्यांना चार लाख क्युसेक्स पाणी सोडावे लागते. ते यापूर्वी सोडले आहे. यावषीर्ही सोडले. याचा परिणाम अलमट्टी धरणाच्या खालील रायचूर, यादगीर आणि विजापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो. आपल्याकडील पाणी पुढे सरकत नाही. ते अडविले गेले असल्याने महापुराची तीव्रता वाढली आहे. याकडे दुर्लक्ष करण्यासाठी ‘अलमट्टी’ची चर्चा घडवून फसवाफसवी केली जात आहे.

टॅग्स :floodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर