शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हा महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, मानवी चुकांबरोबरच प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत

By वसंत भोसले | Updated: August 11, 2019 05:47 IST

दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलयंकारी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाही प्रामुख्याने कारणीभूत आहेत.

- वसंत भोसलेकोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलयंकारी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाही प्रामुख्याने कारणीभूत आहेत. त्यामुळे शासन, प्रशासन आणि जनतेला हात वर करून केवळ निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. याउलट मानवाच्या असंख्य चुका निसर्गाने वारंवार दाखवून देऊनही त्यात सुधारणा करण्याची कोणाची तयारी नाही. त्याचाच फटका निसर्गाने पुन्हा एकदा दिला आहे, हे स्पष्ट होते आहे.दक्षिण महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर तसेच बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागाला या महापुराचा प्रचंड तडाखा बसला आहे. यापूर्वी १९५३, १९८३ आणि २००५ मध्ये महापुराने असा फटका दिला होता. महाबळेश्वरमध्ये उगम पावणा-या कृष्णा नदीचे हे खोरे आहे. महाबळेश्वर ते कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीजवळील दाजीपूरपर्यंतच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून दोन डझन नद्यांचा उगम होतो. त्यांपैकी बहुतांश नद्यांवर धरणे आहेत. त्यांची साठवण क्षमता सुमारे २१० टीएमसी आहे. या सर्व नद्यांचा संगम होत होत शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे सर्व पाणी जमा होते. तेथून कृष्णा नदी कर्नाटकात जाते.नद्यांच्या पात्रातील वाळू उपसा केल्याने त्यांचे निसर्गचक्रही बिघडले आहे. मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. नद्यांची पात्रे अरुंद झाली आहेत आणि नद्यांच्या पात्रापर्यंत शेतजमिनी तयार करून उसाची शेती नदीकाठापर्यंत करण्यात आली आहे. त्याच्या परिणामामुळे नद्यांच्या पात्रात पाणी कमी आणि उभ्या पिकांमध्ये अधिक अशी अवस्था झाली आहे.नद्यांच्या पूरनियंत्रण रेषेत झालेली बांधकामे, धरणांचे अतिरिक्त पाणी एकाच वेळी सोडावे लागण्याचे संकट, नद्यांच्या रचनांमधील फेरबदल, नद्यांवरून जाणाºया रस्त्यांमुळे अडणारे पाणी आदी मानवी चुकांचा फटका आहे. महापुराची तीव्रता गंभीर करणारी ही कारणे ठरली आहेत. कमी कालावधीत पडणारा मोठा पाऊस, धरणे क्षमतेपेक्षा अधिक भरणे आणि पाणलोट क्षेत्राच्या बाहेर पडणाºया पावसाच्या पाण्याचा समावेश करून घेण्यास जागा नसणे आदी मानवी चुकांचा सर्वाधिक फटका बसत आहे.गतवेळच्या महापुराची तीव्रता, त्याचे परिणाम आणि निर्माण होणारे धोके आजवर रेकॉर्डवर आलेले आहेत. तरीही राज्य प्रशासनाची यंत्रणा तत्परतेने काळजी घेत नाही हीदेखील मानवी चूकच आहे. सांगलीजवळील ब्रह्मनाळची घटना हे त्याचे ताजे उदाहरण आहे. क-हाड ते सांगलीपर्यंत किती पाणीपातळी कोठे आली, तर कोणती गावे संकटात येतात, याचे गणित मांडावे असे आहे. २००५च्या पुरातही ब्रह्मनाळ गाव पाण्याने वेढले गेले होते. या गावाला सर्वप्रथम हलविण्याची गरज आहे. त्यासाठी एनडीआरएफ किंवा लष्कराला पाचारण केले पाहिजे. हरिपूर या गावची हीच कहाणी आहे. तेथे तर नदीच्या काठावरच बंगले बांधले गेले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात पूर आल्यावर आंबेवाडी, प्रयाग चिखलीसारखी गावे सर्वप्रथम पाण्याने वेढली जातात. पडणारा पाऊस, भरलेली धरणे, त्यातून सोडण्यात येणारे पाणी तसेच कोल्हापूर आणि सांगलीचा कोणता भाग पाण्याखाली जाणार, हे गणिताप्रमाणे मांडता येऊ शकते; पण हे सर्व रेकॉर्ड, नकाशे तयार कोठे आहेत? ही प्रशासनाची म्हणजे मानवाची चूक आहे. ब्रह्मनाळचे बळी त्याचे आहेत, निसर्गाने घेतलेले नाहीत.‘अलमट्टी’ची चर्चा ही केवळ फसवाफसवीकर्नाटकातील बागलकोटजवळ कृष्णा नदीवर असलेल्या अलमट्टी धरणामुळे फुगवटा येतो. परिणामी, महाराष्ट्रातील नद्यांची पातळी वाढते, अशी चर्चा राजकारणी मंडळी करून लोकांची दिशाभूल करतात. महाराष्ट्रातून साडेतीन लाख क्युसेक्स पाण्याची आवक अलमट्टी धरणात होत असेल, तर त्यांना चार लाख क्युसेक्स पाणी सोडावे लागते. ते यापूर्वी सोडले आहे. यावषीर्ही सोडले. याचा परिणाम अलमट्टी धरणाच्या खालील रायचूर, यादगीर आणि विजापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो. आपल्याकडील पाणी पुढे सरकत नाही. ते अडविले गेले असल्याने महापुराची तीव्रता वाढली आहे. याकडे दुर्लक्ष करण्यासाठी ‘अलमट्टी’ची चर्चा घडवून फसवाफसवी केली जात आहे.

टॅग्स :floodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर