शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

उल्हासनगरातील दुर्घटनाग्रस्त साईशक्ती इमारत पाडकाम कारवाईला प्लॉटधारकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 17:58 IST

गेल्या महिन्यात साईशक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला असून इमारत सील करून प्लॉटधारकाना बाहेर काढले.

सदानंद नाईक

उल्हासनगर : गेल्या महिन्यात साईशक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला असून इमारत सील करून प्लॉटधारकाना बाहेर काढले. दरम्यान सहायक आयुक्त गणेश शिंपी हे महापालिका पथकासह बुधवारी साईशक्ती इमारत जमीनदीस्त करण्यासाठी गेले असता, प्लॉटधारकांनी कारवाईला विरोध केला.

उल्हासनगर महापालिकेने १४७ पेक्षा जास्त इमारती धोकादायक घोषित केल्या असून इमारतीला नोटिसा देऊन नागरिकांना इमारती खाली करण्याचे सांगण्यात आले. तर गेल्या महिन्यात मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने शहरातील सन १९९२ ते ९८ दरम्यान बांधण्यात आलेल्या इमारतीचे सर्वेक्षण करून ५०५ इमारतीची यादी जाहीर केली. त्यांना इमारातीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट आणण्यास सांगितले आहे. दुर्घटनाग्रस्त झालेल्या साईशक्ती इमारती पासून शेजारील इमारती व येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना धोका होऊ नये. म्हणून इमारत जमीनदोस्त करण्यासाठी सहायक आयुक्त गणेश शिंपी हे पथकासह बुधवारी गेले. त्यावेळी इमारत पाडकाम कारवाईची महिती प्लॉटधारकांना मिळल्यावर, ते इमारती भोवती एकत्र जमले. त्यांनी महापालिका पथकाला इमारती पाडकाम कारवाईला विरोध करून यासाठी काही अवधी मागितला आहे.

धोकादायक झालेली दुर्घटनाग्रस्त साईशक्ती इमारत जमीनदोस्त करण्याची गरज असल्याचे मत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे इमारती मधील बेघर झालेल्या नागरिकांनी स्वतः इमारती पाडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे महापालिकेने त्यांना १५ दिवसाचा अवधी देऊन त्यांच्याकडून लेखी तसे लिहून घेतल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी दिली. गेल्या काहीं वर्षात शेकडो इमारती धोकादायक होऊन हजारोजन बेघर झाले. अनेकजण भाडेच्या खोलीत राहून, जुन्या व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करण्याची मागणी करीत आहेत. मात्र अद्याप धोकादायक व जुन्या इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रश्न राज्य शासन दरबारी टांगल्याची टीका होत आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर