शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

उल्हासनगरातील दुर्घटनाग्रस्त साईशक्ती इमारत पाडकाम कारवाईला प्लॉटधारकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 17:58 IST

गेल्या महिन्यात साईशक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला असून इमारत सील करून प्लॉटधारकाना बाहेर काढले.

सदानंद नाईक

उल्हासनगर : गेल्या महिन्यात साईशक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला असून इमारत सील करून प्लॉटधारकाना बाहेर काढले. दरम्यान सहायक आयुक्त गणेश शिंपी हे महापालिका पथकासह बुधवारी साईशक्ती इमारत जमीनदीस्त करण्यासाठी गेले असता, प्लॉटधारकांनी कारवाईला विरोध केला.

उल्हासनगर महापालिकेने १४७ पेक्षा जास्त इमारती धोकादायक घोषित केल्या असून इमारतीला नोटिसा देऊन नागरिकांना इमारती खाली करण्याचे सांगण्यात आले. तर गेल्या महिन्यात मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने शहरातील सन १९९२ ते ९८ दरम्यान बांधण्यात आलेल्या इमारतीचे सर्वेक्षण करून ५०५ इमारतीची यादी जाहीर केली. त्यांना इमारातीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट आणण्यास सांगितले आहे. दुर्घटनाग्रस्त झालेल्या साईशक्ती इमारती पासून शेजारील इमारती व येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना धोका होऊ नये. म्हणून इमारत जमीनदोस्त करण्यासाठी सहायक आयुक्त गणेश शिंपी हे पथकासह बुधवारी गेले. त्यावेळी इमारत पाडकाम कारवाईची महिती प्लॉटधारकांना मिळल्यावर, ते इमारती भोवती एकत्र जमले. त्यांनी महापालिका पथकाला इमारती पाडकाम कारवाईला विरोध करून यासाठी काही अवधी मागितला आहे.

धोकादायक झालेली दुर्घटनाग्रस्त साईशक्ती इमारत जमीनदोस्त करण्याची गरज असल्याचे मत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे इमारती मधील बेघर झालेल्या नागरिकांनी स्वतः इमारती पाडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे महापालिकेने त्यांना १५ दिवसाचा अवधी देऊन त्यांच्याकडून लेखी तसे लिहून घेतल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी दिली. गेल्या काहीं वर्षात शेकडो इमारती धोकादायक होऊन हजारोजन बेघर झाले. अनेकजण भाडेच्या खोलीत राहून, जुन्या व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करण्याची मागणी करीत आहेत. मात्र अद्याप धोकादायक व जुन्या इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रश्न राज्य शासन दरबारी टांगल्याची टीका होत आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर