शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

सरसकट सावकारी कर्जमाफी

By admin | Updated: March 14, 2015 05:05 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील खासगी सावकारांचे कर्ज सरसकटपणे राज्य शासन परतफेड करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील खासगी सावकारांचे कर्ज सरसकटपणे राज्य शासन परतफेड करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. गुरुवारी विधानसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी सावकारी कर्जमाफीवरून सरकारवर जोरदार हल्ला चढविला होता. हिवाळी अधिवेशनात सरकारने सावकारी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात याबाबत कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळबाधितांचे खासगी सावकारांकडील कर्ज राज्य सरकारने भागवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा राज्यातील २३८११ गावांत टंचाईसदृशस्थिती आहे. या सर्व गावातील शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत खासगी सावकारांकडील सरसकट कर्जाची परतफेड सरकार करणार आहे. याबाबत गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. शेतकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे कर्ज असले तरी त्याची परतफेड शासन करणार आहे. राज्यातील तब्बल २० हजार गावांना सातत्याने टंचाईची झळ सोसावी लागते. ही दुष्काळीस्थिती तसेच उत्पादकतेतील घट शेतकरी आत्महत्यांमागील प्रमुख कारण आहे. यावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजना राबविल्या जात आहेत. या योजनेत आतापर्यंत १ हजार ४०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातून राज्यातील १४ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)