शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पाच वर्षे रस्ते होते तरी कुणाचे?

By अतुल कुलकर्णी | Updated: July 17, 2018 04:58 IST

कधी कधी सरकारची पोल कशी खुलते याचे मासलेवाईक उदाहरण सोमवारी विधानसभेत पहायला मिळाले.

नागपूर- कधी कधी सरकारची पोल कशी खुलते याचे मासलेवाईक उदाहरण सोमवारी विधानसभेत पहायला मिळाले. आवर्जून वाचाव्या अशा अनेक गमती आणि गंभीर गोष्टी प्रश्नोत्तराच्या पुस्तिकेत होत्या. त्यात अनेक प्रश्न रस्ते आणि त्यावरील खड्डे यांच्याशी संबंधित होते. एका प्रश्नाचे उत्तर देताना ग्रामविकास विभागाने अजब उत्तर दिले. एका प्रश्नाच्या उत्तरात ‘‘सन २०१२-१३ पासून ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ग्राम विकास विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. अशा प्रकारचे निवेदन फेब्रुवारी २०१८ मध्ये जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहे’’ असे लेखी सांगितले गेले. याचा पहिला अर्थ मंत्रालयात २०१२-१३ साली घेतलेला निर्णय जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचण्यास २०१८ साल उजाडले. दुसरा प्रश्न निघतो की या मधल्या काळात हे रस्ते कुणी दुरुस्त केले? की केलेच नाहीत, की केले असतील तर त्यांचा खर्च कुणी केला? मात्र हे सगळे विचारण्याची वेळच आली नाही, कारण प्रश्नोत्तराचा तासच गोंधळात संपून गेला... बिचारे रस्ते, त्यांचा मालक कोण, याच शोधात एवढी वर्षे राहिली.गोंधळ करायचा नाही असं ठरलंय ना...विधानसभेत विरोधक मुख्यमंत्र्यांना फारसे अडचणीत आणत नाहीत असे कायम बोलले जाते. त्याची प्रचिती सोमवारी आली. दुधाच्या प्रश्नावरून सभागृहात गोंधळ झाला. अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली आणि कामकाज पूर्ण करायचे ठरले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलता बोलता विरोधकांची फिरकी घेतली. ‘‘आपलं ठरलंय ना, की तुम्ही आम्हाला सहकार्य करणार ते... आज कोणती चार विधेयकं काढायची ते तुम्हीच सांगा, पण या आठवड्यापासून गोंधळ न करता काम करायचं आपलं ठरलयं मग आता काम करू...’’ असे मुख्यमंत्री म्हणताच सभागृहात हास्याची खसखस पिकली पण विरोधी बाकावरून कुणीही त्यावर काहीच बोलले नाही... आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू झाले...!सगळे जागेवर बसून घ्या...!दुधाच्या प्रश्नावरून विधानसभा १० मिनिटासाठी तहकूब झाली. पुन्हा कामकाज सुरु झाले त्यावेळी तालिका अध्यक्ष सुहास साबणे अध्यक्षांच्या आसनावर आले. त्यावेळी विरोधी बाकावरील सदस्य आपापल्या जागेवर शांत बसून होेते. तरीही तालिका अध्यक्ष म्हणू लागले, जागेवर बसा... जागेवर बसा..., कुणी उभेच नाही तर जागेवर बसायचे कुणी असा प्रश्न पडलेला असतानाच अध्यक्षांच्या आसनाच्या मागे असणाऱ्या दरवाज्यातून विरोधी पक्ष नेते हातानेच विरोधी बाकावरील सदस्यांना उभे राहा, असे खुणावू लागले... ते पाहून विरोधक पुन्हा घोषणा देत अध्यक्षांकडे गेले. मात्र त्यांच्या घोषणांचा आवाज सभागृहात विरून जाण्याच्या आतच तालिका अध्यक्षांनी सभागृह पुन्हा १० मिनिटांसाठी तहकूब करून टाकले...मुख्यमंत्री, एवढा ताण कशाला घेता...?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी दुपारनंतर दिल्लीला जायचे होते. तोच संदर्भ घेत राष्टÑवादीचे नेते अजित पवार विधानसभेत बोलताना म्हणाले, मुख्यमंत्रीजी, राज्याचे विधिमंडळाचे अधिवेशन विविध कामे याशिवाय तुम्हाला दिल्लीला जायचे असल्याने तिकडचेही काम तुमच्या डोक्यावर आहे. किती ओढाताण करता. तुम्ही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे का जबाबदारी सोपवत नाही? का तुमचा कुणावर विश्वास नाही का? असा सवाल पवार यांनी करताच सभागृहात हंशा पिकला. विधानसभेत चर्चेच्या दरम्यान कामकाज पत्रिकेतील विधेयकांची भरमसाठ संख्या दाखवत पवार म्हणाले, तुमच्या काही जबाबदाºया इतरांना दिल्यास त्यांनाही काम मिळेल आणि तुमचाही भार हलका होईल. मात्र तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही का? असा मिश्किल सवाल केला. त्याला उत्तर देण्यासाठी तावडे उभे राहणार तोच अजित पवारांच्या तिरकस बोलण्याने त्यांनी जागेवरच बसणे पसंत केले. मुख्यमंत्र्यांनी मात्र या मुद्याला स्पर्शही न करता आपले म्हणणे मांडून टाकले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस