शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

‘जेएफएम’ चौकशीसाठी खासदारांची पाच वर्षांपासून पायपीट

By admin | Updated: August 30, 2016 19:01 IST

राज्यात संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या (जेएफएम) कामांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी पाच वर्षांपूर्वी शासनाकडे केली आहे

- ऑनलाइन लोकमत
लोकसभेत हक्कभंग दाखल : भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या मग्रुरीवर नाराजी
अमरावती, दि. 30 - राज्यात संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या (जेएफएम) कामांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी पाच वर्षांपूर्वी शासनाकडे केली आहे. मात्र खासदारांच्या पत्राची दखल घेण्याची तसदी भारतीय वनसेवेतील (आयएफएस) अधिकाऱ्यांनी घेतली नाही. अखेर खा.अडसुळांना आयएफएस अधिकाऱ्यांच्या मग्रुरीवर अंकुश लावण्यासाठी लोकसभेत हक्कभंग दाखल करण्याचा प्रसंग ओढवला आहे, हे विशेष.
 
लोकसहभागातून नागरी क्षेत्रात वनसंरक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनात १२ हजार गाव-खेड्यांत जेएफएम समिती गठित करण्यात आल्यात. या समितींनी केंद्र सरकारकडून येणारे अनुदान हे वनसंरक्षणाबाबत धोरणात्मक निर्णयावर खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र बहुतांश जेएफएम समितींनी गावाच्या हद्दीत कामे न करता ते कार्यक्षेत्राबाहेर करण्यात आलेत, असे खा.अडसूळ यांनी ५ नोंव्हेबर २०१२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे केली होती. खा.अडसुळांच्या या पत्राची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘जेएफएम’च्या कामांची चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना त्यावेळी दिले होते. मात्र पाच वर्षांचा कालावधी लोटूनही खा.अडसूळ यांच्या मागणीनुसार संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या कामांची चौकशी अथवा कारवाईबाबत कळविले नाही, हे वास्तव आहे. लोकसभेचे सदस्य या नात्याने ७ दिवसांच्या आत पत्रावर कार्यवाही करणे ही नियमावली आहे. परंतु आयएफएस अधिकाऱ्यांनी खासदारांच्या पत्राला जुमानले नाही. एवढेच नव्हे तर ‘जेएफएम’च्या कामांची चौकशी न करता त्याच समित्यांना अनुदान कसे देता येईल, अशी खेळी चालविल्याचा आरोप खा. अडसुळांनी केला आहे. १० ते १५ वर्षांपासून ‘जेएफएम’ला अनुदान मिळत असताना सूक्ष्म आराखड्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. गाव-खेड्यात कोणतेही सामाजिक बदल झाले नाही. तरीदेखील त्याच समिती, तेच अध्यक्ष आणि सदस्य कायम ठेवण्यात वनाधिकाऱ्यांनी का रस दाखविला, हे कोडेच खासदारांना आजतागायत कळू शकले नाही. परिणामी खा. अडसुळांना पाच वर्षांपर्यंत पत्राला उत्तर न देण्याचे सौजन्य दाखविणाऱ्या आयएफएस अधिकाऱ्यांविरुद्ध चक्क लोकसभेत हक्कभंग दाखल करण्याचे पाऊल उचलावे लागले आहे. खा. अडसुळांनी ३० जुलै २०१६ रोजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव पुढे लोकसभेच्या हक्कभंग समितीकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. 
 
आठ लाख वनजमिनींवर अतिक्रमण
राज्यात १२ हजार गावांमध्ये गठित केलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीला वनांचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी एकूण २० लाख हेक्टर जमीन देण्यात आली होती. त्यापैकी समितीने परस्पर वनजमिनींचे पट्टे वाटप केल्याची माहिती आहे. आठ लाख वनजमिनींवर अतिक्रमण झाले असून या जमिनी परत घेणे दुरापास्त आहे. कारण या वनजमिनी कोणाला वाटप केल्यात याची अभिलेखात नोंद नाही. वनविभागातून अभिलेखेसुद्धा गहाळ झाले आहेत.
 
‘जेएफएम’वर १० वर्षांपासून बोगस खर्च
वनांचे संरक्षण, व्यवस्थापन हे कागदोपत्री असतानासुद्धा वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांना केंद्र सरकारचे अनुदान दिले जात आहे. ‘जेएफएम’च्या पदाधिकाऱ्यांकडून बनावट खर्च दाखविला जात असताना त्याला अंकुश लावण्याचे काम आयएफएस अधिकाऱ्यांकडून केले जात नाही. अनुदान वाटपाचे निकष का गुंडाळण्यात आले, असा सवाल आयएफएस अधिकाऱ्यांना खा. आनंदराव अडसूळ यांनी केला आहे.
 
‘‘एकाच गावात अनेक वर्षांपासून केंद्र सरकारचे अनुदान खर्च केले जात असताना त्या गावात कोणतेही बदल जाणवत नाही. तरिदेखील ‘जेएफएम’ समितीचे अध्यक्ष, सदस्य कसे कायम राहतात, हा संशोधनाचा विषय आहे. पाच वर्षांपासून ‘जेएफएम’च्या चौकशीची मागणी आहे.
- आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती