शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

पाच वर्षांत येऊ शकते लाखो नोकऱ्यांवर टाच!

By admin | Updated: April 27, 2016 06:52 IST

येत्या पाच ते दहा वर्षांत ५० ते ७० लाख नोकऱ्यांवर टाच येऊ शकते, अशी भीती जागतिक आर्थिक संघटनेने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) वर्तविली आहे.

मुंबई : चौथी औद्योगिक क्रांती येऊ घातली असून, लवकरच त्याचे परिणाम दिसू लागणार आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून, येत्या पाच ते दहा वर्षांत ५० ते ७० लाख नोकऱ्यांवर टाच येऊ शकते, अशी भीती जागतिक आर्थिक संघटनेने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) वर्तविली आहे. दावोस येथे जागतिक आर्थिक संघटनेची नुकतीच एक परिषद झाली. त्यात त्यांनी मांडलेल्या अहवालात कौशल्य विकासाअभावी आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे असंख्य नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, असा अंदाज वर्तविला आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि जैवतंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत. कुशल कामगारांच्या अभावामुळे अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. हॉस्पिटॅलिटी अर्थात सेवा उद्योगात आणि वस्तुनिर्मिती उद्योगात सध्या मोठ्या प्रमाणात रोबोट्सचा वापर वाढला आहे. चीन आणि जपानमध्ये हे प्रमाण अधिक आहे. जपानमध्ये प्रत्येक १० हजार कामगारांमागे १५०० रोबोट काम करत आहेत. हे प्रमाण येत्या काळात वाढणार असून, कामगारांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होईल.