शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

चार वर्षात पाच हजार लघुउद्योग बंद पडले!

By admin | Updated: June 10, 2014 23:24 IST

छोट्या छोट्या निर्णयांसाठी लागणारा विलंब आणि थंडावलेल्या निर्णय प्रक्रियेचा फटका राज्यातील लघु उद्योगांना बसला असून गेल्या चार वर्षात राज्यातील ४८९४ लघुउद्योग बंद पडले आहेत.

चार वर्षात पाच हजार लघुउद्योग बंद पडले!आयुक्त पद वर्षानुवर्षे रिक्त, राजकीय उदासिनतेचा राज्याला फटकाअतुल कुलकर्णीमुंबई - छोट्या छोट्या निर्णयांसाठी लागणारा विलंब आणि थंडावलेल्या निर्णय प्रक्रियेचा फटका राज्यातील लघु उद्योगांना बसला असून गेल्या चार वर्षात राज्यातील ४८९४ लघुउद्योग बंद पडले आहेत. त्याचा फटका ३०,३६२ कामगारांना बसला आहे. सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांच्या पाठपुराव्याबाबत देखील शासनाची उदासीनता कारणीभूत ठरली असून २०१०-११ मध्ये या उपक्रमांचीफक्त ४.८३ टक्केच पुर्तता झाली आहे. शिवाय गेल्या दोन वर्षातील ही आकडेवारीच उपलब्ध नाही.अडीच वर्षापासून राज्याचे उद्योग आयुक्त हे पद रिक्त आहे. अनेक महिन्यापासून याचा पदभार फुटबॉल सारखा या अधिकार्‍यांकडून त्या अधिकार्‍याकडे दिला जात आहे. सध्या हे उद्योग सचिवांकडेच आयुक्तांचाही पदभार आहे. एका ज्येष्ठ अधिकार्‍याच्या मतानुसार देशात असलेल्या मंदीच्या लाटेमुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा काहीअंशी टिकून राहीली मात्र जे चित्र आज समोर आहे ते महाराष्ट्राला साजेसे नक्कीच नाही. उद्योगाच्या कोणत्याच क्षेत्रात सांगावी अशी प्रगती नाही. राज्याचे उद्योग धोरण देखील वर्षभर पडून राहीले. वर्षानंतर त्यात कोणतीही सुधारणा न करता ते मंजूर झाले. जर सुधारणा करायचीच नव्हती तर ते पडून का ठेवले गेले याचे उत्तर कोणीही देत नाही. मुंबईच्या बंदरातून क्रूड ऑईल आणि तत्सम गोष्टी गुजरातेत नेल्या जातात आणि तेथे पोर्ट विकसीत केलेले असल्यामुळे गुंतवणूक आणि रोजगारात गुजरात आपल्यापेक्षा कितीतरी पुढे गेले. आपल्याकडे आहे ते पोर्ट देखील विकसीत करण्याबाबत कमालीची अनास्था असल्याने जहाज कापण्यासाठीचे नवी मुंबईच्या जवळचे पोर्ट देखील अत्यंत बकाल अवस्थेत पडून आहे. परिणामी ऑगस्ट १९९१ ते ऑक्टोबर २०१३ या कालावधीत आपल्यापेक्षा ६,१७६ प्रकल्प कमी असताना गुजरातेत आपल्यापेक्षा २,४८,५३९ कोटींची अधीक गुंतवणूक झाली. आपल्या राज्यात दर लाख लोकसंख्येमागे ३१ कारखाने चालू आहेत. ज्यातील सरासरी दैनिक रोजगार १,३९१ एवढा आहे. त्याउलट पंजाबमध्ये हेच प्रमाण दर लाख लोकसंख्येमागे ६४ कारखाने व २१९७ लोकांना रोजगार असे आहे. छोट्याश्या गोव्यात देेखील हे प्रमाण ४३ आणि ३८२४ एवढे आहे. थेट परकीय गंुतवणुकीत देखील महाराष्ट्र कितीतरी मागे गेला असूृन एप्रिल २००६ ते मार्च २००७ मध्ये राज्यात ६४ प्रकल्पांपोटी १२,९१६ कोटींची परकीय गुंतवणूक झाली होती तेथे एप्रिल २०११ ते मार्च २०१२ या काळात १०५ प्रकल्पांमध्ये ती गंुतवणूक ५४५४ कोटींवर आली आहे.निर्णयांमधील विलंब, अधिकार्‍यांची वानवा, अनेक जागी वर्षानुवर्षे अधिकारी नसणे आहेत त्यातले देखील वर्षानुवर्षे न बदलले जाणे या कारणांचा फटका राज्यातल्या उद्योग जगताला बसल्याचेही सुत्रांचे म्हणणे आहे.