शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीची सव्वाशे कारणे होणार हद्दपार!

By admin | Updated: October 2, 2015 04:17 IST

सामान्य माणसाला सरकार दरबारी अनेकदा अनेक ठिकाणी द्याव्या लागणाऱ्या लाचेपासून कायमची मुक्तता मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचमुक्ती अभियान हाती घेतले आहे.

यदु जोशी , मुंबईसामान्य माणसाला सरकार दरबारी अनेकदा अनेक ठिकाणी द्याव्या लागणाऱ्या लाचेपासून कायमची मुक्तता मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचमुक्ती अभियान हाती घेतले आहे. ज्या कारणांसाठी वारंवार लाच द्यावी लागते अशी सव्वाशे कारणे त्यांनी शोधली असून, लाच देण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींनाच पायबंद घालण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरविले आहे. सरकारी कार्यालयांमध्ये चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही, हा सार्वत्रिक अनुभव अनेकांच्या वाट्याला येतो. त्यातून ‘टेबलाखालून काही तरी द्यावेच लागते’ अशी समाजाची मानसिकता बनली आहे. सरकारी कार्यालयांच्या बाबतीत असलेली ही मानसिकता बदलण्यासाठी कामकाजाची नवी पद्धत विकसित केली जात आहे. लाच देण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींनाच पायबंद घालण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक गोष्टी आॅनलाइन करणे, त्यातील कालापव्यय संपविणे, नियम काटेकोर करून पळवाटा बंद करणे, मानवी हस्तक्षेप संपविणे, अडवणूक करणाऱ्या घटकांना पायबंद घालणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. याबाबत संबंधित सचिवांना पत्र पाठवून मुख्यमंत्री मते मागविणार असून त्यानंतर रुपरेषा निश्चित करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यत्वे, गृह, महसूल, नगरविकास, शिक्षण या खात्यांबाबत लाचखोरीचे अधिकाधिक प्रकार घडतात,असा अनुभव आहे. मुख्यमंत्र्यांनीही मुख्यत्वे याच खात्यांमधून लाचखोरी हद्दपार करण्यावर भर दिला आहे.1 नवीन नळ कनेक्शन घेणे, घरपट्टी जास्त न आकारण्यासाठी, बिगर शेती परवान्यासाठी, बांधकाम न पाडण्यासाठी2रेती वाहतूक, माती वाहतुकीची परवानगी, वीटभट्टी सुरू करण्याचा परवाना, रेशन दुकानावर कारवाई न टाळण्यासाठी, जमीन-घराचे खरेदीखत व इतर दस्त3विम्याची रक्कम मृताच्या वारसाच्या नावावर जमा करण्यासाठी, शिवारात लावलेल्या झाडांची नोंद घेण्यासाठी, विविध प्रकारच्या अनुदानांचा लाभ, हॉटेल खाद्य परवाना 4समन्सची माहिती देण्यासाठी, खोटा गुन्हा दाखल करून त्यामध्ये अटक करण्याची बतावणी करणे, गुन्ह्याच्या तपासात पैसे उकळणे, दाखल गुन्ह्याचे प्रकरण मिटविण्यासाठी, लोकल ट्रेनमध्ये फेरीवाल्याचा धंदा करू देण्यासाठी 5पदोन्नतीचे प्रस्ताव शिफारस करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, घरकुलांचे बिल काढणे, मनरेगाची मोजमाप पुस्तिका नोंद, मोकळ्या जमिनीची नोंद ग्रामपंचायत अभिलेखावर करणे, अंगणवाडी बांधकामाची चौकशी, नवीन घरांसाठी घरपट्टी सुरू करून एनओसी देणे, आंतरजातीय विवाहितांना शासकीय मदतीचा चेक देणे, कार्यालयीन बिले मंजूर करणे आणि मंजूर बिले अदा करणे, अतिक्रमणाला अभय, मूळ घरावर अधिकचे बांधकाम करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्या देणे, शाळांमध्ये नवीन इयत्ता सुरू करण्याची परवानगी, शाळा सोडल्याचा दाखला देणे.