शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

‘पाच पसार आरोपींना पकडा, सुटी मिळवा’

By admin | Updated: March 4, 2017 05:23 IST

पालिका निवडणुकीच्या महिनाभर सुरू असलेल्या रणधुमाळीमुळे पोलिसांना रात्रंदिवस बंदोबस्तासाठी ताटकळत राहावे लागले.

मनीषा म्हात्रे,मुंबई- पालिका निवडणुकीच्या महिनाभर सुरू असलेल्या रणधुमाळीमुळे पोलिसांना रात्रंदिवस बंदोबस्तासाठी ताटकळत राहावे लागले. अशात बंदोबस्तानंतर थोडीशी उसंत मिळावी म्हणून सुटीची मागणी करणाऱ्या पोलिसांना ‘आधी पाच आरोपी पकडा, नंतर सुटी मिळवा’ अशा पोलीस उपायुक्तांच्या अजब फर्मानामुळे मुंबई पोलीस वैतागले आहेत. जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर झाली. त्यात सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने आरोप-प्रत्यारोप वाढले. त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी पोलिसांची सुटीही रद्द करण्यात आली होती. त्यात मुंबई पोलिसांनी तब्बल ३००० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मुंबईतील लढत प्रतिष्ठेची असल्याने येथील निवडणुकीवर सर्वांच्याच नजरा लागलेल्या. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र. त्यात भाजपा, शिवसेना, काँग्रेस, एमआयएम आणि सपाचे पाचही पक्षांचे बळ जास्त असल्याने येथील सुरक्षेच्या जबाबदारीमुळे पोलिसांना डोळ्यात तेल घालून बसावे लागत होते. त्यामुळे ८ तासांच्या ड्युटीऐवजी चक्क या वेळी पोलिसांना २४ तास कार्यरत राहावे लागले.स्थानिक पातळीवर वरिष्ठ निरीक्षकावर येथील जबाबदारीचा भार सर्वाधिक होता. अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले. त्यांच्या चोख नियोजनामुळे बंदोबस्त सुरळीत पार पडला. मुळात पोलीस ठाण्यातील खालच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ निरीक्षकांच्या आदेशाने सुटीची परवानगी मिळते, तर वरिष्ठ निरीक्षकांना सुटीसाठी पोलीस उपायुक्तांची परवानगी बंधनकारक असते. अशात बंदोबस्ताच्या ताणातून थोडी उसंत मिळावी म्हणून पोलिसांनी सुटीची मागणी केली. मात्र ‘आधी पाच पसार आरोपींना पकडा, त्यानंतर सुटी मागा,’ असे अजब फर्मान मुंबईच्या एका पोलीस उपायुक्ताने काढले आहे. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षकांच्या ताणात भर पडली आहे. आरोपींना पकडण्यासाठी वरिष्ठ निरीक्षकांनी खालच्या अधिकाऱ्यांच्या सुट्यांवर गदा आणल्याने येथील पोलीस वैतागले आहेत. >बळजबरीचा ताण अंगाशी येतोया प्रकरणी वरिष्ठ निरीक्षकाने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, मुळात बंदोबस्तात चांगले काम केले म्हणून कौतुकाची थाप देण्याऐवजी सुटीवर गदा आणणे चुकीचे आहे. बंदोबस्तादरम्यान कुटुंबाला वेळ देणे शक्य झाले नाही त्यामुळे सुटी घेऊन त्यांच्यासोबत बाहेर जाण्याचे कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तर आणखीन एका वरिष्ठ निरीक्षकाच्या म्हणण्यानुसार, आधीच्याच ताणातून सुटका झाली नसताना हा बळजबरीचा ताण अंगाशी येत आहे. त्यामुळे ही एक प्रकारची छळवणूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे पोलिसांच्या ताणात भर पडत आहे. पसार आरोपींचा शोध घेण्यात महिने उलटतात. त्यामुळे पुन्हा सुटीकडे दुर्लक्ष करत ही मंडळी आरोपींच्या शोधासाठी दिवसरात्र सापळे रचत असल्याचे काहीसे चित्र मुंबईत पाहावयास मिळते आहे.