शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

‘पाच पसार आरोपींना पकडा, सुटी मिळवा’

By admin | Updated: March 4, 2017 05:23 IST

पालिका निवडणुकीच्या महिनाभर सुरू असलेल्या रणधुमाळीमुळे पोलिसांना रात्रंदिवस बंदोबस्तासाठी ताटकळत राहावे लागले.

मनीषा म्हात्रे,मुंबई- पालिका निवडणुकीच्या महिनाभर सुरू असलेल्या रणधुमाळीमुळे पोलिसांना रात्रंदिवस बंदोबस्तासाठी ताटकळत राहावे लागले. अशात बंदोबस्तानंतर थोडीशी उसंत मिळावी म्हणून सुटीची मागणी करणाऱ्या पोलिसांना ‘आधी पाच आरोपी पकडा, नंतर सुटी मिळवा’ अशा पोलीस उपायुक्तांच्या अजब फर्मानामुळे मुंबई पोलीस वैतागले आहेत. जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर झाली. त्यात सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने आरोप-प्रत्यारोप वाढले. त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी पोलिसांची सुटीही रद्द करण्यात आली होती. त्यात मुंबई पोलिसांनी तब्बल ३००० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मुंबईतील लढत प्रतिष्ठेची असल्याने येथील निवडणुकीवर सर्वांच्याच नजरा लागलेल्या. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र. त्यात भाजपा, शिवसेना, काँग्रेस, एमआयएम आणि सपाचे पाचही पक्षांचे बळ जास्त असल्याने येथील सुरक्षेच्या जबाबदारीमुळे पोलिसांना डोळ्यात तेल घालून बसावे लागत होते. त्यामुळे ८ तासांच्या ड्युटीऐवजी चक्क या वेळी पोलिसांना २४ तास कार्यरत राहावे लागले.स्थानिक पातळीवर वरिष्ठ निरीक्षकावर येथील जबाबदारीचा भार सर्वाधिक होता. अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले. त्यांच्या चोख नियोजनामुळे बंदोबस्त सुरळीत पार पडला. मुळात पोलीस ठाण्यातील खालच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ निरीक्षकांच्या आदेशाने सुटीची परवानगी मिळते, तर वरिष्ठ निरीक्षकांना सुटीसाठी पोलीस उपायुक्तांची परवानगी बंधनकारक असते. अशात बंदोबस्ताच्या ताणातून थोडी उसंत मिळावी म्हणून पोलिसांनी सुटीची मागणी केली. मात्र ‘आधी पाच पसार आरोपींना पकडा, त्यानंतर सुटी मागा,’ असे अजब फर्मान मुंबईच्या एका पोलीस उपायुक्ताने काढले आहे. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षकांच्या ताणात भर पडली आहे. आरोपींना पकडण्यासाठी वरिष्ठ निरीक्षकांनी खालच्या अधिकाऱ्यांच्या सुट्यांवर गदा आणल्याने येथील पोलीस वैतागले आहेत. >बळजबरीचा ताण अंगाशी येतोया प्रकरणी वरिष्ठ निरीक्षकाने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, मुळात बंदोबस्तात चांगले काम केले म्हणून कौतुकाची थाप देण्याऐवजी सुटीवर गदा आणणे चुकीचे आहे. बंदोबस्तादरम्यान कुटुंबाला वेळ देणे शक्य झाले नाही त्यामुळे सुटी घेऊन त्यांच्यासोबत बाहेर जाण्याचे कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तर आणखीन एका वरिष्ठ निरीक्षकाच्या म्हणण्यानुसार, आधीच्याच ताणातून सुटका झाली नसताना हा बळजबरीचा ताण अंगाशी येत आहे. त्यामुळे ही एक प्रकारची छळवणूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे पोलिसांच्या ताणात भर पडत आहे. पसार आरोपींचा शोध घेण्यात महिने उलटतात. त्यामुळे पुन्हा सुटीकडे दुर्लक्ष करत ही मंडळी आरोपींच्या शोधासाठी दिवसरात्र सापळे रचत असल्याचे काहीसे चित्र मुंबईत पाहावयास मिळते आहे.