शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
6
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
9
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
10
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
11
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
12
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
13
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
14
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
15
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
16
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
17
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
19
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
20
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश

मराठवाड्यात पाच टक्के पाणीसाठा

By admin | Updated: March 18, 2016 02:30 IST

दुष्काळामुळे मराठवाड्यात सर्वत्र आताच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून लहान-मोठ्या सर्व ८४३ सिंचन प्रकल्पांमध्ये अवघा ४१८ दलघमी (पाच टक्के) इतका उपयुक्त साठा

औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात सर्वत्र आताच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून लहान-मोठ्या सर्व ८४३ सिंचन प्रकल्पांमध्ये अवघा ४१८ दलघमी (पाच टक्के) इतका उपयुक्त साठा राहिला आहे. बाष्पीभवन आणि दैनंदिन वापर लक्षात घेता हा साठा ५ आठवडेही पुरणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.चार वर्षांपासून मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडतो आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात विभागातील धरणांमध्ये जेमतेम पाणीसाठा होऊ शकला. परिणामी डिसेंबरपासूनच मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. ज्या धरणांमध्ये पाणीसाठा होता तोही आता जवळपास संपला आहे. उन्हामुळे होणारे बाष्पीभवन, सध्याचा दैनंदिन वापर, यामुळे या धरणांमधून दररोज ९ दलघमी पाणी संपत आहे. याच दराने हा साठा संपत गेल्यास येत्या पाच आठवड्यांतच तो शून्यावर येईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. - मराठवाड्यात सर्वात वाईट अवस्था ही मध्यम साठा असणाऱ्या धरणांची आहे. विभागात एकूण ७५ मध्यम धरणे असून सद्य:स्थितीत त्यातील ४९ धरणे कोरडी ठणठणीत आहेत. यात सर्वाधिक १६ धरणे ही उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात १३, लातूर जिल्ह्यात ७, जालना जिल्ह्यात ३, औरंगाबाद जिल्ह्यात ५, नांदेड जिल्ह्यात ४ आणि परभणी जिल्ह्यातील २ धरणांचा यामध्ये समावेश आहे.