शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

मराठवाड्यात पाच टक्के पाणीसाठा

By admin | Updated: March 18, 2016 02:30 IST

दुष्काळामुळे मराठवाड्यात सर्वत्र आताच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून लहान-मोठ्या सर्व ८४३ सिंचन प्रकल्पांमध्ये अवघा ४१८ दलघमी (पाच टक्के) इतका उपयुक्त साठा

औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात सर्वत्र आताच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून लहान-मोठ्या सर्व ८४३ सिंचन प्रकल्पांमध्ये अवघा ४१८ दलघमी (पाच टक्के) इतका उपयुक्त साठा राहिला आहे. बाष्पीभवन आणि दैनंदिन वापर लक्षात घेता हा साठा ५ आठवडेही पुरणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.चार वर्षांपासून मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडतो आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात विभागातील धरणांमध्ये जेमतेम पाणीसाठा होऊ शकला. परिणामी डिसेंबरपासूनच मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. ज्या धरणांमध्ये पाणीसाठा होता तोही आता जवळपास संपला आहे. उन्हामुळे होणारे बाष्पीभवन, सध्याचा दैनंदिन वापर, यामुळे या धरणांमधून दररोज ९ दलघमी पाणी संपत आहे. याच दराने हा साठा संपत गेल्यास येत्या पाच आठवड्यांतच तो शून्यावर येईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. - मराठवाड्यात सर्वात वाईट अवस्था ही मध्यम साठा असणाऱ्या धरणांची आहे. विभागात एकूण ७५ मध्यम धरणे असून सद्य:स्थितीत त्यातील ४९ धरणे कोरडी ठणठणीत आहेत. यात सर्वाधिक १६ धरणे ही उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात १३, लातूर जिल्ह्यात ७, जालना जिल्ह्यात ३, औरंगाबाद जिल्ह्यात ५, नांदेड जिल्ह्यात ४ आणि परभणी जिल्ह्यातील २ धरणांचा यामध्ये समावेश आहे.