शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

खालापूरमध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: June 8, 2017 06:10 IST

खालापूर तालुक्यातील शिरवली गावामधील दोन महिला व त्यांच्याबरोबर तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवावोशी : खालापूर तालुक्यातील शिरवली गावामधील दोन महिला व त्यांच्याबरोबर तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मीनाक्षी वाकनिस (३१), शुभम मिलिंद वाकनिस (८), गौरी गणेश आरते (३३), तेजस्विनी गणेश आरते (१०), तुषार गणेश आरते (७) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने शिरवलीसह संपूर्ण तालुकाच हादरून गेला आहे.बुधवार, ७ जून रोजी खालापूर तालुक्यातील शिरवली गावातील मीनाक्षी आणि गौरी या नेहमीप्रमाणे सकाळी कपडे धुण्यासाठी गावाला लागून असलेल्या बाळगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ गेल्या होत्या. या वेळी त्यांच्याबरोबर शुभम, तेजस्विनी अणि तुषार तीन मुलेही होती. यातील शुभम पाण्यात आंघोळीसाठी उतरला. थोड्यावेळाने तो खोल पाण्यात बुडायला लागल्याचे बघून त्याची आई मीनाक्षी त्याला वाचविण्यासाठी धावली. ती बुडायला लागल्याचे बघून तेजस्विनी अणि तुषार तिला वाचवण्यासाठी धावले. मात्र, पाणी खोल असल्याने व पोहता येत नसल्याने ती मुलेही बुडायला लागली. हे बघून त्यांची आई गौरी त्यांना वाचविण्यासाठी गेली असता तीही बुडाली. तिकडे कपडे धूवत असलेल्या तिसऱ्या महिलेने त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र यात तिला अपयश आले. त्या महिलेचे नाव कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी पांढरपट्टे, तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी आपल्या संपूर्ण टीमसह घटनास्थळी धाव घेतली. >गावकऱ्यांचे प्रयत्न निष्फळगावातील एक व्यक्ती नदीकडे येत असल्याने, त्याने हा प्रकार बघून आरडाओरडा करून गावातील लोकांना मदतीसाठी बोलाविले. काही वेळातच गावातील तरु ण व नागरिकांनी नदीकाठी धाव घेत मदत करण्यास सुरु वात केली, मात्र पाण्यात बुडून पाचही जणांचा मृत्यू झाला. या वेळी गावातील सर्वांनी धावाधाव करून बुडालेल्यांचे प्राण वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र तो निष्फळ ठरला.