शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

खालापूरमध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: June 8, 2017 06:10 IST

खालापूर तालुक्यातील शिरवली गावामधील दोन महिला व त्यांच्याबरोबर तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवावोशी : खालापूर तालुक्यातील शिरवली गावामधील दोन महिला व त्यांच्याबरोबर तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मीनाक्षी वाकनिस (३१), शुभम मिलिंद वाकनिस (८), गौरी गणेश आरते (३३), तेजस्विनी गणेश आरते (१०), तुषार गणेश आरते (७) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने शिरवलीसह संपूर्ण तालुकाच हादरून गेला आहे.बुधवार, ७ जून रोजी खालापूर तालुक्यातील शिरवली गावातील मीनाक्षी आणि गौरी या नेहमीप्रमाणे सकाळी कपडे धुण्यासाठी गावाला लागून असलेल्या बाळगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ गेल्या होत्या. या वेळी त्यांच्याबरोबर शुभम, तेजस्विनी अणि तुषार तीन मुलेही होती. यातील शुभम पाण्यात आंघोळीसाठी उतरला. थोड्यावेळाने तो खोल पाण्यात बुडायला लागल्याचे बघून त्याची आई मीनाक्षी त्याला वाचविण्यासाठी धावली. ती बुडायला लागल्याचे बघून तेजस्विनी अणि तुषार तिला वाचवण्यासाठी धावले. मात्र, पाणी खोल असल्याने व पोहता येत नसल्याने ती मुलेही बुडायला लागली. हे बघून त्यांची आई गौरी त्यांना वाचविण्यासाठी गेली असता तीही बुडाली. तिकडे कपडे धूवत असलेल्या तिसऱ्या महिलेने त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र यात तिला अपयश आले. त्या महिलेचे नाव कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी पांढरपट्टे, तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी आपल्या संपूर्ण टीमसह घटनास्थळी धाव घेतली. >गावकऱ्यांचे प्रयत्न निष्फळगावातील एक व्यक्ती नदीकडे येत असल्याने, त्याने हा प्रकार बघून आरडाओरडा करून गावातील लोकांना मदतीसाठी बोलाविले. काही वेळातच गावातील तरु ण व नागरिकांनी नदीकाठी धाव घेत मदत करण्यास सुरु वात केली, मात्र पाण्यात बुडून पाचही जणांचा मृत्यू झाला. या वेळी गावातील सर्वांनी धावाधाव करून बुडालेल्यांचे प्राण वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र तो निष्फळ ठरला.