शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खालापूरमध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: June 8, 2017 06:10 IST

खालापूर तालुक्यातील शिरवली गावामधील दोन महिला व त्यांच्याबरोबर तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवावोशी : खालापूर तालुक्यातील शिरवली गावामधील दोन महिला व त्यांच्याबरोबर तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मीनाक्षी वाकनिस (३१), शुभम मिलिंद वाकनिस (८), गौरी गणेश आरते (३३), तेजस्विनी गणेश आरते (१०), तुषार गणेश आरते (७) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने शिरवलीसह संपूर्ण तालुकाच हादरून गेला आहे.बुधवार, ७ जून रोजी खालापूर तालुक्यातील शिरवली गावातील मीनाक्षी आणि गौरी या नेहमीप्रमाणे सकाळी कपडे धुण्यासाठी गावाला लागून असलेल्या बाळगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ गेल्या होत्या. या वेळी त्यांच्याबरोबर शुभम, तेजस्विनी अणि तुषार तीन मुलेही होती. यातील शुभम पाण्यात आंघोळीसाठी उतरला. थोड्यावेळाने तो खोल पाण्यात बुडायला लागल्याचे बघून त्याची आई मीनाक्षी त्याला वाचविण्यासाठी धावली. ती बुडायला लागल्याचे बघून तेजस्विनी अणि तुषार तिला वाचवण्यासाठी धावले. मात्र, पाणी खोल असल्याने व पोहता येत नसल्याने ती मुलेही बुडायला लागली. हे बघून त्यांची आई गौरी त्यांना वाचविण्यासाठी गेली असता तीही बुडाली. तिकडे कपडे धूवत असलेल्या तिसऱ्या महिलेने त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र यात तिला अपयश आले. त्या महिलेचे नाव कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी पांढरपट्टे, तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी आपल्या संपूर्ण टीमसह घटनास्थळी धाव घेतली. >गावकऱ्यांचे प्रयत्न निष्फळगावातील एक व्यक्ती नदीकडे येत असल्याने, त्याने हा प्रकार बघून आरडाओरडा करून गावातील लोकांना मदतीसाठी बोलाविले. काही वेळातच गावातील तरु ण व नागरिकांनी नदीकाठी धाव घेत मदत करण्यास सुरु वात केली, मात्र पाण्यात बुडून पाचही जणांचा मृत्यू झाला. या वेळी गावातील सर्वांनी धावाधाव करून बुडालेल्यांचे प्राण वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र तो निष्फळ ठरला.