शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

शेतकऱ्यांना पुरविणार पाच लाख गायी

By admin | Updated: February 17, 2017 03:34 IST

कर्ज आणि दुष्काळाने जेरीस आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी राज्य सरकार गायी देणार असल्याचे महादेव जाणकर

नितीन अग्रवाल / नवी दिल्लीकर्ज आणि दुष्काळाने जेरीस आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी राज्य सरकार गायी देणार असल्याचे महादेव जाणकर यांनी सांगितले. पुढील वर्षात शेतकऱ्यांना पाच लाख गायी देण्यासह त्यांचा चारा आणि उपचाराची व्यवस्थाही राज्य सरकारकडून करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पशुपालन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी येथे दिली. गायींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडेल, असेही ते म्हणाले. दुधाच्या विक्रीसाठीही राज्य सरकारने व्यवस्था केली आहे. गायींची योग्य देखभाल आणि दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांना कौशल्यविकास मंत्रालयाच्या सहकार्याने प्रशिक्षित करण्यात येत असून, जवळपास दीड लाख शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेत आहेत. राज्य सरकारच्या या योजनेसाठी आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकर यांच्याकडून प्रगत जातीचे बैल मिळणार आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी दिल्लीत आलेले जानकर गुरुवारी ‘लोकमत’शी बोलत होते. या योजनेमुळे राज्यातील दुग्धोत्पादन वेगाने वाढेल. काही वर्षांतच राज्य दुधाबाबत स्वयंपूर्ण होईल तसेच लाखो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. दुधाची गरज भागविण्यासाठी राज्याला अमूलकडून दररोज लाखो लीटर दूध खरेदी करावे लागते. मात्र, महाराष्ट्राचा स्वत:चा ब्रॅण्ड ‘आरे शक्ती’ही राष्ट्रीय पातळीवरील अमूलसारख्या कंपन्यांशी स्पर्धा करील. केंद्र सरकारच्या उपक्रमानांही दूध पुरविण्याची राज्याची योजना आहे. गोरेगावमध्ये दुग्धविकास शास्त्र पीडी कॉलेज आणि औरंगाबाद, अकोला, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये मत्स्य कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव आपण केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांना दिला आहे. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही जानकर म्हणाले.