इस्लामपूर (जि.सांगली) : शेतीपूरक व्यवसायाशी निगडित कडकनाथ कोंबडी पालनातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील ८ हजारावर सभासद शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आता धूम ठोकली आहे. कडकनाथ कोंबडी पालनाशी संबंधित कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती असून सुमारे आठ हजार गुंतवणूकदारांची ५०० कोटींपेक्षा अधिक रक्कम अडकली आहे.
गुंतवणूकदारांचा तगादा मागे लागल्याने या कंपनीच्या संचालकांनी पुणे येथे मुक्काम ठोकला आहे. आता अटकपूर्व जामीन घेण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कंपनीने १00 रुपयांच्या मुद्रांकावर अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता. आमची कंपनी प्रामुख्याने रेशीम, मत्स्य, कुक्कुटपालन व शेळी पालनाचा व्यवसाय करत आहे. लोकांना प्रशिक्षण देणे, व्यवसाय उभा करुन देणे तसेच व्यवसायातून उत्पादित होणारा माल खरेदी करणे याबरोबरच शेतकºयांना विश्वास देऊन खरेदीची कंपनी हमी देते. आमची कंपनी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करत नाही, असे सांगत कंपनीने शेतकºयांची फसवणूक केली आहे. या मुद्रांकावर बोगस स्वाक्षºया आहेत, त्यावर नावाचा उल्लेख नाही. ‘लोकमत’ने या बोगस कंपनीचा पर्दाफाश केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.