शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

विदर्भात पाच शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: November 29, 2014 00:38 IST

अमरावतीसह वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांनी संपविली जीवनयात्रा.

अकोला: दुष्काळाचे सावट गडद होत असतानाच विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. नापिकीला कंटाळून विदर्भात गुरुवारी व शुक्रवारी पाच शेतकर्‍यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारखेडा येथे एका युवा शेतकर्‍याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू विष्णू राठोड हे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. या जिल्ह्यात आत्महत्येची दुसरी घटना मंगरूळपीर तालुक्यातील तर्‍हाळा येथे घडली. या घटनेत एका कर्जबाजारी शेतकर्‍याच्या एकुलत्या एक मुलाने विहीरीत उडी घेऊन मृत्यूला कवटाळले. राहूल आगळे हे त्याचे नाव असून, त्याचा १७ डिसेंबर रोजी विवाह निश्‍चित करण्यात आला होता. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील रामकृष्ण शत्रुघ्न गावंडे या ३६ वर्षीय शेतकर्‍यानेही विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी, कर्ज आणि मुलांच्या आजारपणाला तो कंटाळला होता.भद्रावती तालुक्यातील विजासन येथील शेतकर्‍याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. सुरेश लटारी घुगुल (४२) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. यावर्षी झालेली नापिकी आणि कर्जाचा डोंगर सतत वाढत असल्याने त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ येथील विनोद गोविंद माळीक (३५) या शेतकर्‍याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे चार एकर शेती असुन त्यांच्यावर ८0 हजार रुपयांचे बँकेचे कर्ज आणि ५0 हजार रुपये खासगी कर्ज होते.