शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पाच शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: November 29, 2014 00:38 IST

अमरावतीसह वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांनी संपविली जीवनयात्रा.

अकोला: दुष्काळाचे सावट गडद होत असतानाच विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. नापिकीला कंटाळून विदर्भात गुरुवारी व शुक्रवारी पाच शेतकर्‍यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारखेडा येथे एका युवा शेतकर्‍याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू विष्णू राठोड हे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. या जिल्ह्यात आत्महत्येची दुसरी घटना मंगरूळपीर तालुक्यातील तर्‍हाळा येथे घडली. या घटनेत एका कर्जबाजारी शेतकर्‍याच्या एकुलत्या एक मुलाने विहीरीत उडी घेऊन मृत्यूला कवटाळले. राहूल आगळे हे त्याचे नाव असून, त्याचा १७ डिसेंबर रोजी विवाह निश्‍चित करण्यात आला होता. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील रामकृष्ण शत्रुघ्न गावंडे या ३६ वर्षीय शेतकर्‍यानेही विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी, कर्ज आणि मुलांच्या आजारपणाला तो कंटाळला होता.भद्रावती तालुक्यातील विजासन येथील शेतकर्‍याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. सुरेश लटारी घुगुल (४२) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. यावर्षी झालेली नापिकी आणि कर्जाचा डोंगर सतत वाढत असल्याने त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ येथील विनोद गोविंद माळीक (३५) या शेतकर्‍याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे चार एकर शेती असुन त्यांच्यावर ८0 हजार रुपयांचे बँकेचे कर्ज आणि ५0 हजार रुपये खासगी कर्ज होते.