शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूमुळे पाच जणांचा मृत्यू

By admin | Updated: November 3, 2016 02:29 IST

शहरात डेंग्यू व मलेरियाच्या साथीचे थैमान सुरू आहे. तुर्भे नाक्यावर एका महिन्यामध्ये संशयित डेंग्यूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला

नामदेव मोरे,

नवी मुंबई- शहरात डेंग्यू व मलेरियाच्या साथीचे थैमान सुरू आहे. तुर्भे नाक्यावर एका महिन्यामध्ये संशयित डेंग्यूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नवी मुंबईमध्ये डेंग्यू व मलेरियाची साथ आटोक्यात असल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. पण प्रत्यक्षात शहरवासी तापाच्या साथीने हैराण झाले आहेत. तुर्भे नाका येथे प्रत्येक घरातील किमान एकतरी व्यक्ती तापाने आजारी आहे. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये पल्लवी महादेव गायकवाड, धु्रपदा रोहिदास गवळी, गीता प्रसाद, प्रेम भारत भालेकर व शंकरी हलदार यांचा समावेश आहे. एक महिन्यात पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे शाखा प्रमुख तय्यब पटेल यांनी दोन महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.पण पालिका प्रशासन लक्ष देत नाहीत. यामुळे राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. तुर्भे परिसरामधील नागरिकांसाठी महापालिकेचे रूग्णालयच नाही. तुर्भे गावातील माताबाल रूग्णालय बंद झाले आहे. यामुळे नाइलाजाने रूग्णांना वाशी प्रथम संदर्भ रूग्णालयात जावे लागत आहे. तेथे गेल्यानंतर बेड शिल्लक नसल्याचे कारण सांगून रूग्णांना मुंबईमध्ये घेवून जा असे सल्ले दिले जात आहेत. वेळेत उपचार मिळत नसल्याने रूग्णांचा मृत्यू होत आहे. पण पालिका प्रशासन जबाबदारी झटकून मृत्यू डेंग्यूमुळे नसल्याचे कारण देत जबाबदारी झटकत आहेत. परिसरामध्ये औषध फवारणीही केली जात नाही. महापालिका प्रशासन डेंग्यू व मलेरियासाठी नागरिकांवरच दोष देत आहे. करावे गावामध्ये डेंग्यूची साथ पसरल्यानंतर नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. पण उपाययोजना करण्याऐवजी तब्बल २० नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. घरामध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. यामुळे नागरिक महापालिकेकडे तक्रार करण्याचेही टाळू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी बोनसरी गावामध्ये एक तरूणाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही तरूणाचा मृत्यू डेंग्यूमुळे झालाच नाही असा दावा करण्यात आला होता. पण याविषयी वृत्त प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी लगेच परिसरामध्ये धूर व औषध फवारणी करण्यात आली होती. नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशीच स्थिती राहिली तर आंदोलन करावे लागेल, असा इशाराही तुर्भे परिसरातील रहिवाशांनी दिला असून यापुढे अजून कोणाचा मृत्यू झाला तर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे. >डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्यांची नावे पल्लवी महादेव गायकवाडधु्रपदा रोहिदास गवळीगीता प्रसादप्रेम भारत भालेकरशंकरी हलदार >तुर्भे नाक्यावर डेंग्यू व मलेरियाच्या साथीने थैमान घातले आहे. एका महिन्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु महापालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून अशीच स्थिती राहिली तर महापालिकेविरोधात आंदोलन करण्यात येईल. - तैय्यब पटेल, शाखा प्रमुख, शिवसेना