शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

अधिवेशनाचे पाच दिवस सरकारच्या कसोटीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 06:38 IST

दुष्काळावरून विरोधक आक्रमक : आरक्षणाचे काय करणार?

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे पहिल्या आठवड्यातील तीन दिवसांचे कामकाज प्रचंड गदारोळातच गुंडाळण्यात आल्यानंतर उद्यापासून सुरू होणाऱ्या दुसºया व अंतिम आठवड्यात सरकारची मराठा धनगर व मुस्लिम आरक्षण तसेच दुष्काळावरून कसोटी लागणार आहे.

मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भातील अनुक्रमे राज्य मागासवर्ग आयोग आणि टीसचा अहवाल सभागृहात मांडला जात नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षांनी आधीच घेतली आहे. त्यामुळे विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होऊन सरकारची कोंडी करतील, हे स्पष्ट आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुद्यावर कुठला मार्ग काढतात, याबाबत उत्सुकता असेल. १ डिसेंबरला मराठा समाजाने आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी यापूर्वीच केले आहे. याचा अर्थ ३० नोव्हेंबरला अधिवेशन संपता संपता मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केले जाईल, असा घेतला जात आहे.

मराठा समाजाला सामाजिक- शैक्षणिक मागासवर्ग (एसईबीसी) प्रवर्गात आरक्षण देण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केली, मात्र ओबीसींमध्ये आरक्षण द्यावे, असा एक दबाव आहे. तसेच समाजाला नेमके किती टक्के आरक्षण द्यावे, याचा निर्णय सरकारला करायचा आहे. त्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल सरकार सभागृहात मांडेल. तशी तयारी सरकारने आधीच दर्शविली आहे.राज्य सरकार देणार पॅकेज!राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीत फळबागांना हेक्टरी एक लाख रुपये तर इतर पिकांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. सरकार दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन