शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अधिवेशनाचे पाच दिवस सरकारच्या कसोटीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 06:38 IST

दुष्काळावरून विरोधक आक्रमक : आरक्षणाचे काय करणार?

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे पहिल्या आठवड्यातील तीन दिवसांचे कामकाज प्रचंड गदारोळातच गुंडाळण्यात आल्यानंतर उद्यापासून सुरू होणाऱ्या दुसºया व अंतिम आठवड्यात सरकारची मराठा धनगर व मुस्लिम आरक्षण तसेच दुष्काळावरून कसोटी लागणार आहे.

मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भातील अनुक्रमे राज्य मागासवर्ग आयोग आणि टीसचा अहवाल सभागृहात मांडला जात नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षांनी आधीच घेतली आहे. त्यामुळे विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होऊन सरकारची कोंडी करतील, हे स्पष्ट आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुद्यावर कुठला मार्ग काढतात, याबाबत उत्सुकता असेल. १ डिसेंबरला मराठा समाजाने आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी यापूर्वीच केले आहे. याचा अर्थ ३० नोव्हेंबरला अधिवेशन संपता संपता मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केले जाईल, असा घेतला जात आहे.

मराठा समाजाला सामाजिक- शैक्षणिक मागासवर्ग (एसईबीसी) प्रवर्गात आरक्षण देण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केली, मात्र ओबीसींमध्ये आरक्षण द्यावे, असा एक दबाव आहे. तसेच समाजाला नेमके किती टक्के आरक्षण द्यावे, याचा निर्णय सरकारला करायचा आहे. त्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल सरकार सभागृहात मांडेल. तशी तयारी सरकारने आधीच दर्शविली आहे.राज्य सरकार देणार पॅकेज!राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीत फळबागांना हेक्टरी एक लाख रुपये तर इतर पिकांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. सरकार दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन