शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
5
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
6
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
9
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
10
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
11
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
12
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
13
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
14
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
15
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
16
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
17
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
18
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
19
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
20
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  

पाच धरणे पडली कोरडी

By admin | Updated: May 30, 2016 02:22 IST

मान्सून लांबल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाला उशिरा सुरुवात होणार आहे.

अलिबाग : मान्सून लांबल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाला उशिरा सुरुवात होणार आहे. लांबलेला पाऊस आणि कडक उन्हामुळे जिल्ह्यातील २८ धरणांपैकी रानीवली, वरंध, खिंडवाडी, कोर्थुडे आणि खेरे ही पाच धरणे कोरडी पडली आहेत. एकत्रित धरणांमध्ये फक्त १८.५६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा तीव्र बसण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाने दिली.रायगड जिल्ह्यात उष्णता वाढल्याने ३८ अंशापर्यंत तापमान नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्यातील अस्तित्वात असणाऱ्या २८ लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा प्रचंड उष्णतेमुळे आटत चालले आहे. त्यामुळे त्यातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या योजनांवर विपरीत परिणाम होत आहे. सदरील धरणांमध्ये फक्त १८.५६१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये लघुपाटबंधारे विभागांतर्गत २८ धरणांचा समावेश येतो. या सर्व धरणांची एकत्रित साठवण क्षमता ही ७१.५७५ दशलक्ष घनमीटर आहे. ६८.२८६ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा वापरण्याजोगा आहे. परंतु आता धरणांनी तळ गाठायला सुरुवात केल्याने पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे. पाऊस वेळेवर पडल्यास पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ शकते, परंतु वातावरणातील वाढते तापमान आणि लांबलेल्या मान्सूनमुळे सध्या तरी तशी शक्यता दिसून येत नाही. अशीच परिस्थिती अजून काही दिवस राहिल्यास नागरिकांचे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता आहे. प्रशासनाचा सात कोटी ८८ लाख रुपयांचा टंचाई आराखडाही कुचकामी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याची समस्या जाणवणार असल्यानेच नागरिकांनी पाणी जपून वापरावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात दिल्या होत्या. (प्रतिनिधी)>धरणातील शिल्लक पाणीसाठारानीवली धरणाची साठवण क्षमता ही २.२२४ दलघमी आहे. सध्या तेथे ० टक्के पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे वरंध धरणाची साठवण क्षमता २.०८४ दलघमी सध्या ० टक्के, खिंडवाडी २.१३६ / ० टक्के, कोर्थुडे २.४९३ / ०, खेरे १.६५८ /० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर उर्वरित २३ धरणांत१८.५६१ पाणीसाठा आहे. पाऊस लवकर आला नाही, तर तोही आटण्याची शक्यता आहे.