शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

पाच धरणे पडली कोरडी

By admin | Updated: May 30, 2016 02:22 IST

मान्सून लांबल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाला उशिरा सुरुवात होणार आहे.

अलिबाग : मान्सून लांबल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाला उशिरा सुरुवात होणार आहे. लांबलेला पाऊस आणि कडक उन्हामुळे जिल्ह्यातील २८ धरणांपैकी रानीवली, वरंध, खिंडवाडी, कोर्थुडे आणि खेरे ही पाच धरणे कोरडी पडली आहेत. एकत्रित धरणांमध्ये फक्त १८.५६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा तीव्र बसण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाने दिली.रायगड जिल्ह्यात उष्णता वाढल्याने ३८ अंशापर्यंत तापमान नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्यातील अस्तित्वात असणाऱ्या २८ लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा प्रचंड उष्णतेमुळे आटत चालले आहे. त्यामुळे त्यातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या योजनांवर विपरीत परिणाम होत आहे. सदरील धरणांमध्ये फक्त १८.५६१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये लघुपाटबंधारे विभागांतर्गत २८ धरणांचा समावेश येतो. या सर्व धरणांची एकत्रित साठवण क्षमता ही ७१.५७५ दशलक्ष घनमीटर आहे. ६८.२८६ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा वापरण्याजोगा आहे. परंतु आता धरणांनी तळ गाठायला सुरुवात केल्याने पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे. पाऊस वेळेवर पडल्यास पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ शकते, परंतु वातावरणातील वाढते तापमान आणि लांबलेल्या मान्सूनमुळे सध्या तरी तशी शक्यता दिसून येत नाही. अशीच परिस्थिती अजून काही दिवस राहिल्यास नागरिकांचे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता आहे. प्रशासनाचा सात कोटी ८८ लाख रुपयांचा टंचाई आराखडाही कुचकामी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याची समस्या जाणवणार असल्यानेच नागरिकांनी पाणी जपून वापरावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात दिल्या होत्या. (प्रतिनिधी)>धरणातील शिल्लक पाणीसाठारानीवली धरणाची साठवण क्षमता ही २.२२४ दलघमी आहे. सध्या तेथे ० टक्के पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे वरंध धरणाची साठवण क्षमता २.०८४ दलघमी सध्या ० टक्के, खिंडवाडी २.१३६ / ० टक्के, कोर्थुडे २.४९३ / ०, खेरे १.६५८ /० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर उर्वरित २३ धरणांत१८.५६१ पाणीसाठा आहे. पाऊस लवकर आला नाही, तर तोही आटण्याची शक्यता आहे.