शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

पुलगाव पालिकेच्या नगराध्यक्षासह पाच नगरसेवक अपात्र

By admin | Updated: June 23, 2016 21:10 IST

विरोधी पक्षाशी हातमिळणवणी केल्याप्रकरणी येथील नगराध्यक्षासह पाच नगरसेवकांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी एका आदेशाद्वारे अपात्र घोषित

ऑनलाइन लोकमत

पुलगाव(वर्धा), दि. 23 - पक्षाशी बंडखोरी करून सत्तेकरिता विरोधी पक्षाशी हातमिळणवणी केल्याप्रकरणी येथील नगराध्यक्षासह पाच नगरसेवकांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी एका आदेशाद्वारे अपात्र घोषित केले. या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.अपात्र सदस्यांमध्ये नगराध्यक्ष मनीष साहू यांच्यासह काँग्रेसचे राजीव बतरा, सुनील ब्राम्हणकर, स्मीता चव्हाण व सेनेच्या जयश्री बरडे यांचा समावेश आहे. हिंगणघाट नगर पालिकेच्या नगराध्यक्षासह सहा नगरसेवकांना अशाच कारणाने अपात्र व्हावे लागले होते. यानंतरची जिल्ह्यातील ही दुसरी मोठी अपात्रतेची कार्यवाही आहे.सन २०११ मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे १०, अपक्ष ३ व सेना १ अशा १४ सदस्यांच्या गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करण्यात आली होती. परंतु, नगराध्यक्षांवर अविश्वासाचे सावट दिसताच नगराध्यक्ष मनीष साहू यांच्यासह काँग्रेसचे राजीव बतरा, सुनील ब्राम्हणकर, स्मीता चव्हाण हे काँग्रेसचे चार व सेनेच्या जयश्री बरडे हे नगरसेवक नोंदणीकृत काँग्रेस व सहकारी पक्षाच्या अधिकृत गटातून बाहेर पडले. नंतर त्यांनी भाजपाच्या पाच नगरसेवकांशी हात मिळवणी करून सत्ता काबीज केली.यावर काँग्रेसचे गटनेता राजन चौघरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करून पक्ष व गटाशी बंडखोरी केल्याप्रकरणी त्या पाचही नगरसेवकांवर कायदेशीर कार्यवाहीची मागणी केली होती. या याचिकेवर तत्कालिन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी महाराष्ट्र लोकल एॅथोरिटी मेंबर्स डिसक्वॉलिफीकेशन अ‍ॅक्ट १९८६ च्या कलम ७ यु.एस. १६ (आय.ए.) अन्वये दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतली. प्रकरण निर्णयाप्रत पोहचताच जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांची चंद्रपूरला बदली झाली. अशातच पुलगाव दारूगोळा भांडारात अग्निस्फोट झाला. यामुळे निर्णय व्हायचा होता. परिणामी पाचही नगरसेवकांवर महिनाभरापासून अपात्रतेची टांगती तलवार होती.अखेर गुरुवारी या प्रकरणी जिल्हाधिकारी नवाल यांनी महत्त्वपूर्ण निर्णय देत नगराध्यक्ष मनीष साहू यांच्यासह या पाचही नगरसेवकांना अपात्र घोषित केले. नगर परिषद निवडणूक तोंडावर असताना काँग्रेस नगराध्यक्ष व नगरसेवकांना काँग्रेसकडून घरचा अहेर मिळाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.