शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

शिशुगृहातून पाच बालकेगायब

By admin | Updated: January 21, 2015 01:38 IST

शहरातील हालगेगल्लीतील महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या स्व. सेठ नेमीचंद दीपचंद बडेरा शिशुगृहातील पाच बालक गायब असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी उघडकीस आली.

परळी : शहरातील हालगेगल्लीतील महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या स्व. सेठ नेमीचंद दीपचंद बडेरा शिशुगृहातील पाच बालक गायब असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी उघडकीस आली. परळी पोलिसात यासंदर्भात तक्रार देण्यात येणार असल्याचे बालकल्याण समितीचे दत्ता नलावडे यांनी सांगितले.असाह्ण, बेघर बालकांचे संगोपन करणारी व अनाथाचा नाथ म्हणून या शिशुगृहाची ख्याती आहे. येथे ० ते ६ वयोगटातील निराधार बालकांचे संगोपन करण्यात येते. नियमित तपासणीसाठी बालकल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकाऱ्यांनी शनिवारी भेट दिली़ तेव्हा ही माहिती उघडकीस आली. शिशुगृहाच्या रेकॉर्डवर ११ बालक असल्याची नोंद होती. प्रत्यक्षात ६ बालक असल्याचेच समितीच्या लक्षात आले. इतर पाच बालके कोठे आहेत, याबाबत विचारणा केली असता शिशुगृहातील कर्मचाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्यांनी हा प्रकार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिला.तात्पुरत्या स्वरुपात दत्तक दिली शिशुगृहातील पाच बालक तात्पुरत्या स्वरुपात राजस्थान, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातील मोठ्या व्यक्तींकडे दत्तक दिली, तर एका बालकावर हैद्राबाद येथे उपचार सुरू असल्याचे महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनचे सचिव (जालना) चे वीरेंद्रप्रसाद धोका यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)च्महाराष्ट्रात आमच्या संस्थेच्या वतीने जालना, जळगाव आणि परळी येथे शिशुगृह चालविण्यात येतात. यात कोणताही चुकीचा प्रकार घडलेला नाही. आमच्याकडे बालक दत्तक घेण्यासाठी ४५० जणांची प्रतीक्षा यादी आहे. ही बालके गायब झालेली नाहीत तर ती संस्थेने तात्पुरत्या स्वरूपात दत्तक दिली आहेत. ही सर्व बालके सुरक्षित असल्याचे मारवाडी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव वीरेंद्र धोका यांनी सांगितले.दत्तक परवानाच नाही मुले दत्तक द्यायचेच असेल तर कुटुंबाची सर्व माहिती घेऊनच संस्थेला परवानगी देण्यात येते. बालगृहातील मुले अशी दत्तक देताना त्यासाठी शासनाचा परवाना त्या संस्थेकडे आवश्यक असतो. सध्या असा परवानाच नाही. २०१३ साली परवान्याची मुदत संपल्यानंतर त्यांनी पुन्हा असा परवाना घेतलेला नसल्याचे बालकल्याण समितीचे अध्यक्ष दत्ता नलावडे यांनी सांगितले.परळीतील बडेरा शिशुगृहात २००९ ते २०१५ या कालावधीत ७३ असाह्ण, बेघर बालकांचे संगोपन करण्यात आले. ७३ पैकी ४५ बालक कायदेशीररीत्या दत्तक देण्यात आले आहेत. ४ बालके इतर संस्थांकडे स्थलांतरीत करण्यात आले, तर सहा बालकांचा मृत्यू झाला आहे.११ बालकांपैकी एका बालकाला उपचारासाठी हैदराबादला दाखल केले आहे, तर चौघांना दत्तक दिली आहेत. यात कोणताही गैरप्रकार नसून मुलांना दत्तक देण्यासाठी बालकल्याण समितीकडे प्रस्ताव दिलेला होता असे शिशुगृहाचे काळजीवाहक गजानन शिंदे यांनी दिली.