शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

मच्छीमार बंदरांना धोका

By admin | Updated: August 2, 2015 02:21 IST

अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी समुद्रमार्गे येऊन मुंबईवर केलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नौदलाने केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील सागरकिनाऱ्यावरील ५२५ मासेमारी

- नारायण जाधव,  ठाणेअजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी समुद्रमार्गे येऊन मुंबईवर केलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नौदलाने केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील सागरकिनाऱ्यावरील ५२५ मासेमारी बंदरांपैकी मुंबईच्या बधवार पार्क, गोराई-मनोरी, उत्तन, रेवस, मांडवा, दाभोळ, मालवणसह ९१ बंदरे अतिसंवेदनशील आढळली आहेत. यामुळे गुजरात व तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर या बंदरांवर येणाऱ्या मासेमारी नौकांसह खलाशांची नोंद ठेवण्यासाठी गृह विभागाच्या निर्देशानुसार मत्स्यविकास विभागाने टोकन पद्धत राबवून २४ तास तीन पाळ्यांत सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, २७९ सुरक्षारक्षकांसह २३ पर्यवेक्षक असे ३०२ सुरक्षा कर्मचारी या बंदरांवर लवकरच दिसतील. यासाठी वर्षाला पाच कोटी ४१ लाख तीन हजार २६० खर्च होणार आहे.राज्याच्या सागरी सुरक्षेसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सागरी सुरक्षा समिती स्थापन केली असून सध्या कोस्टगार्ड, कस्टम व सागरी पोलीस यंत्रणेमार्फत समुद्रात ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या नौकांसह मच्छीमार नौकांची तपासणी करून नोंद ठेवली जाते. मात्र, मुुंबईवरील २६/११ चा अतिरेकी हल्ला करणारे अतिरेकी डहाणूच्या किनाऱ्यामार्गे मुंबईत शिरले होते. तेव्हापासून मुंबईसह राज्याच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या हल्ल्यानंतर नौदलाने मच्छीमार नौकांचे अवागमन असलेल्या राज्यांतील ५९१ लँडिंग पॉइंट्सची तपासणी केली. त्यात ९१ पॉइंट्स अतिरेकी हल्ल्यांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आढळले. यातील ५६ पॉइंट्स मत्स्यविकास विभागाच्या अखत्यारीत येतात, तर ३५ लँडिंग पॉइंट्सवर मासळी उतरवली जात नाही. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याने या सर्व ९१ मच्छीमार बंदरांवर सुरक्षा तैनात करणे आवश्यक आहे. त्यानुसार, या बंदरांवर ये-जा करणाऱ्या नौकांचे अवागमन, कागदपत्रांची तपासणी आणि खलाशांची नोंद ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, मासेमारी नौकेची, खलाशांची नोंद घेऊन त्यांना एक टोकन दिले जाणार आहे. सदर नौका परत बंदरात आल्यावर त्यांना हे टोकन परत करावे लागेल. प्रत्येक नौकेची हालचाल टिपणार असून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सागरी पोलीस, मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांनी तत्काळ मदत करणे सक्तीचे केले आहे.पालघर जिल्हा : नरपाडा-डहाणू, गुंगवाडा-धाकटी डहाणू, वरोर, तडीयाळ, कंबोडे, घिवलीगाव, रानगाव, वसई-बॅसिन, खोचिवडे, पाचूबंदर, पाणजू, भुईगाव, कोल्लार, सुरूचीबाग, अर्नाळा, वैतरणा, मारबंळपाडारायगड जिल्हा : मांडवा, रेवस, जुनी आरसीएफ जेट्टी, थळनवगाव, अलिबाग चौपाटी, रेवदंडा ब्रिज-१, रेवदंडा ब्रिज-२, साळाव, नांदगाव, मुरूड खोरा, आगरदांडा-१, राजपुरी, दिघी पोर्ट जेट्टी, दिघी पॅसेंजर जेट्टी, शेखाडी, जीवनाबंदर, बागमांडला, मांदाड-१, दादर, आंबेतरत्नागिरी जिल्हा : वेशवी, वेळास, केळशी, दाभोळ, वेलदूर, रानवी, पडवे, जयगड, नांदिवडे, सैतवडे, जांभारी, गणपतीपुळे, काळबादेवी, रनपार-घोळप, पूर्णगड, मिऱ्या, भगवती बंदर, नेवरे, कुर्ले, साखरी नाटे, मुसाकाझी, अंबोळगड, माडबनसिंधुदुर्ग जिल्हा : मीठमुंब्री-तारांबुरी, कुणकेश्वर, काटवन, तांबडडेग, सर्जेकोट-मिऱ्याबाद, तारकर्ली-काळेथर, मालवण जेट्टी, खवणे, वेंगुर्ला, मोचेमाड, आरवलीटाक, तेरेखोल, देवगड, गजबादेवी.मुंबई : बधवार पार्क, गणेशमूर्तीनगर, गीतानगर, गोराई, मनोरी, वांद्रे सागरी सेतू जेट्टी, सांताक्रुझ जेट्टी, वर्सोवा, पिरवाडी, माणिकटोकठाणे जिल्हा : उत्तन, दिवाळे, बेलापट्टी, पाली, वाशी ब्रिज, सारसोळे.