शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना चाऱ्याची चिंता

By admin | Updated: September 10, 2015 02:39 IST

दुष्काळी परिस्थितीत मराठवाड्यातील सुमारे ४० लाख जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, अनेक तालुक्यांतील चारा आताच संपला आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत दावणीतील

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीत मराठवाड्यातील सुमारे ४० लाख जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, अनेक तालुक्यांतील चारा आताच संपला आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत दावणीतील गुरे कशी जगवायची, ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. सद्य:स्थितीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत मिळून चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गुरांसाठी चाराच शिल्लक नसल्याने उसावर जनावरे जगविण्याचे काम सुरू आहे. काही तालुक्यांत महागड्या कडब्यावर गुरे जगविली जात आहेत. बीड जिल्ह्यात चाऱ्याची गंभीर स्थिती आहे. दररोज आठ हजार ८८२ टन चारा लागतो; मात्र चाराच शिल्लक नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात एक महिन्यापूर्वीच चारा संपला. ७४ प्रस्ताव असतानाही जिल्ह्यात केवळ एकच छावणी सुरू झाली आहे. या ठिकाणी पंढरपूर, इंदापूर येथून चारा आणावा लागत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दहापैकी दोन तालुक्यांत चाऱ्याची बरी परिस्थिती आहे. इतर तालुक्यांत टंचाई आहे. परभणी जिल्ह्यात १० दिवसांचाच चारा उपलब्ध आहे; पण पुढे काय, असा प्रश्न आहे़ जिल्ह्यात महिन्याकाठी ७३ हजार ५२१ टन चाऱ्याची आवश्यकता आहे. हिंगोली जिल्ह्यातही परभणीसारखीच परिस्थिती आहे. नांदेड जिल्ह्यात ८ लाख ५० हजार २५० पशुधन आहे. त्यांना प्रतिदिन ४४ लाख ९८ हजार ६७१ किलो चारा लागतो. ७५ दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे.कडब्याचे दर कडाडले सध्या हिरवा चारा मिळणे कठीण झाल्याने कडब्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. बीडमध्ये शेकडा तीन हजार रुपये आणि जालना व लातूर जिल्ह्यात पेंढीला ४० रुपये असे कडब्याचे भाव आहेत.चार दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने चारा उपलब्ध होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पावसामुळे चारा उपलब्ध झाल्यास दरही कमी होतील, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.चाऱ्यासाठी अनुदान प्राप्त झाले असले तरी कर्नाटकातून आणि मराठवाड्याच्या बाहेरील जिल्ह्यातून चारा मागवावा लागणार आहे. त्या प्रक्रियेला आणखी विलंब लागणार आहे. चाराटंचाईमुळे अनेक शेतकरी पशुधन विक्रीसाठी बाजारात घेऊन जात आहेत. ५० हजार रुपये किमतीची बैलजोडी २५ ते ३० हजार रुपयांना विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे.