शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना चाऱ्याची चिंता

By admin | Updated: September 10, 2015 02:39 IST

दुष्काळी परिस्थितीत मराठवाड्यातील सुमारे ४० लाख जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, अनेक तालुक्यांतील चारा आताच संपला आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत दावणीतील

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीत मराठवाड्यातील सुमारे ४० लाख जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, अनेक तालुक्यांतील चारा आताच संपला आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत दावणीतील गुरे कशी जगवायची, ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. सद्य:स्थितीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत मिळून चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गुरांसाठी चाराच शिल्लक नसल्याने उसावर जनावरे जगविण्याचे काम सुरू आहे. काही तालुक्यांत महागड्या कडब्यावर गुरे जगविली जात आहेत. बीड जिल्ह्यात चाऱ्याची गंभीर स्थिती आहे. दररोज आठ हजार ८८२ टन चारा लागतो; मात्र चाराच शिल्लक नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात एक महिन्यापूर्वीच चारा संपला. ७४ प्रस्ताव असतानाही जिल्ह्यात केवळ एकच छावणी सुरू झाली आहे. या ठिकाणी पंढरपूर, इंदापूर येथून चारा आणावा लागत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दहापैकी दोन तालुक्यांत चाऱ्याची बरी परिस्थिती आहे. इतर तालुक्यांत टंचाई आहे. परभणी जिल्ह्यात १० दिवसांचाच चारा उपलब्ध आहे; पण पुढे काय, असा प्रश्न आहे़ जिल्ह्यात महिन्याकाठी ७३ हजार ५२१ टन चाऱ्याची आवश्यकता आहे. हिंगोली जिल्ह्यातही परभणीसारखीच परिस्थिती आहे. नांदेड जिल्ह्यात ८ लाख ५० हजार २५० पशुधन आहे. त्यांना प्रतिदिन ४४ लाख ९८ हजार ६७१ किलो चारा लागतो. ७५ दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे.कडब्याचे दर कडाडले सध्या हिरवा चारा मिळणे कठीण झाल्याने कडब्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. बीडमध्ये शेकडा तीन हजार रुपये आणि जालना व लातूर जिल्ह्यात पेंढीला ४० रुपये असे कडब्याचे भाव आहेत.चार दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने चारा उपलब्ध होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पावसामुळे चारा उपलब्ध झाल्यास दरही कमी होतील, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.चाऱ्यासाठी अनुदान प्राप्त झाले असले तरी कर्नाटकातून आणि मराठवाड्याच्या बाहेरील जिल्ह्यातून चारा मागवावा लागणार आहे. त्या प्रक्रियेला आणखी विलंब लागणार आहे. चाराटंचाईमुळे अनेक शेतकरी पशुधन विक्रीसाठी बाजारात घेऊन जात आहेत. ५० हजार रुपये किमतीची बैलजोडी २५ ते ३० हजार रुपयांना विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे.