शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

‘सावकारी’सारखी ‘सरसकट’ कर्जमाफी ठरणार ‘फार्स’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2017 04:35 IST

सरसकट कर्जमाफीच्या निकषांकडे शेतकऱ्यांचे लक्ष

अकोला : परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाकडून तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला; मात्र यासंदर्भात शासन निर्णयातील ‘कार्यक्षेत्रा’च्या जाचक अटींमुळे कर्जदार शेतकऱ्यांना सावकारी कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्याप्रमाणेच पाच एकरावरील जमीनधारक शेतकऱ्यांना निकषांच्या आधारे सरकारकडून तत्त्वत: मान्यता दिलेली सरसकट कर्जमाफी ‘फार्स ’ठरणार काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने सरसकट कर्जमाफी कोणकोणत्या निकषांच्या आधारे दिली जाते, याकडे आता शेतकऱ्यांकडे लक्ष लागले आहे.संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येत असल्याचा निर्णय शासनाकडून जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर गत १० एप्रिल २०१५ रोजी शासनामार्फत सावकारी कर्जमाफीचा निर्णय काढण्यात आला. या निर्णयातील विविध निकष आणि अटींमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले आहे, असे शेतकरी सावकारी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार असल्याची अट समाविष्ट करण्यात आली. या कार्यक्षेत्राच्या जाचक अटींमुळे बहुसंख्य कर्जदार शेतकऱ्यांना सावकारी कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकले नाही. त्यामुळे शासनाने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या सावकारी कर्जमाफीचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही. या पृष्ठभूमीवर राज्यातील पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना निकषांच्या आधारे सरसकट कर्जमाफी देण्यास शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली असली तरी; प्रत्यक्षात कोणकोणत्या निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येणार आहे, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे सावकारी कर्जमाफीप्रमाणे निकषांच्या आधारे देण्यात येणारी सरसकट कर्जमाफीदेखील केवळ ‘फार्स ’ तर ठरणार नाही ना, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने सरसकट कर्जमाफीसंदर्भात शासन निर्णयातील निकष केव्हा जाहीर होतात आणि सरसकट कर्जमाफीसाठी प्रत्यक्ष किती शेतकरी पात्र ठरतात, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.