शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

‘सावकारी’सारखी ‘सरसकट’ कर्जमाफी ठरणार ‘फार्स’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2017 04:35 IST

सरसकट कर्जमाफीच्या निकषांकडे शेतकऱ्यांचे लक्ष

अकोला : परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाकडून तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला; मात्र यासंदर्भात शासन निर्णयातील ‘कार्यक्षेत्रा’च्या जाचक अटींमुळे कर्जदार शेतकऱ्यांना सावकारी कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्याप्रमाणेच पाच एकरावरील जमीनधारक शेतकऱ्यांना निकषांच्या आधारे सरकारकडून तत्त्वत: मान्यता दिलेली सरसकट कर्जमाफी ‘फार्स ’ठरणार काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने सरसकट कर्जमाफी कोणकोणत्या निकषांच्या आधारे दिली जाते, याकडे आता शेतकऱ्यांकडे लक्ष लागले आहे.संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येत असल्याचा निर्णय शासनाकडून जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर गत १० एप्रिल २०१५ रोजी शासनामार्फत सावकारी कर्जमाफीचा निर्णय काढण्यात आला. या निर्णयातील विविध निकष आणि अटींमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले आहे, असे शेतकरी सावकारी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार असल्याची अट समाविष्ट करण्यात आली. या कार्यक्षेत्राच्या जाचक अटींमुळे बहुसंख्य कर्जदार शेतकऱ्यांना सावकारी कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकले नाही. त्यामुळे शासनाने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या सावकारी कर्जमाफीचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही. या पृष्ठभूमीवर राज्यातील पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना निकषांच्या आधारे सरसकट कर्जमाफी देण्यास शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली असली तरी; प्रत्यक्षात कोणकोणत्या निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येणार आहे, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे सावकारी कर्जमाफीप्रमाणे निकषांच्या आधारे देण्यात येणारी सरसकट कर्जमाफीदेखील केवळ ‘फार्स ’ तर ठरणार नाही ना, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने सरसकट कर्जमाफीसंदर्भात शासन निर्णयातील निकष केव्हा जाहीर होतात आणि सरसकट कर्जमाफीसाठी प्रत्यक्ष किती शेतकरी पात्र ठरतात, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.