शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
3
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
4
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
6
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
7
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
8
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
9
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
10
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
11
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
12
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
13
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
14
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
15
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
16
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
17
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
18
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
19
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
20
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार

‘वॉटर कप’ स्पर्धेत साताऱ्यातील वेळू प्रथम

By admin | Updated: August 18, 2016 02:23 IST

अभिनेता आमीर खान याच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील वेळू आणि जायगाव या दोन गावांनी अनुक्रमे

मुंबई : अभिनेता आमीर खान याच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील वेळू आणि जायगाव या दोन गावांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. तर, अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील वाठोडा चांदसला तिसरा क्रमांक मिळाला.राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेकरिता आमीर खान याने ‘पाणी फाऊंडेशन’ स्थापन करून ही स्पर्धा सुरू केली होती. या संस्थेने पश्चिम महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तर मराठवाड्ययातून बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई आणि विदर्भातून अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्याची निवड केली होती. राज्यातील ११६ गावे स्पर्धेत सहभागी झाली. सर्र्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रांमपचायतींना ५० लाख रुपयांचे पहिले, ३० लाख रुपयांचे दुसरे आणि २० लाखांचे तृतीय पारितोषिक दिले गेले. (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमीर खान यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत संस्थेतर्फे ५० लाख आणि सरकारतर्फे २० लाख असे एकूण ७० लाख रुपये वेळू गावाने पटकाविले. जायगावला ३० लाख मिळाले. वाठोडा चांदस ग्रामपंचायतीला २५ लाखांचे बक्षीस देण्यात आले.वेळू गावाला पिण्याच्या पाण्याची कायमची समस्या श्रमदानातून मिटवली आहे आणि या यशाचे सर्व श्रेय गावकऱ्यांना जाते.- पूनम भोसले, सरपंच, वेळू