शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

सिद्धगडावर पहिल्यांदा दीपोत्सव !

By admin | Updated: November 2, 2016 02:45 IST

सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी वीरगती प्राप्त झाली

नेरळ : सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी वीरगती प्राप्त झाली, ते हुतात्मे झाले. तेथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा ज्योत उभारण्यात आली असून पहिल्यांदाच येथे दिवाळीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. पाचशेहून अधिक पणत्या प्रज्वलित करून वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर भाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील तसेच क्र ांतिवीरांचे स्मरण व्हावे आणि सिद्धगडचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहावा, या निमित्ताने पवित्र वीरभूमी सिद्धगड येथे प्रथमच दीपावलीनिमित्त दिवे रोषणाईचा उत्सव हा शहिदांचे स्मरण म्हणून कर्जत तालुक्यातील अवसरे येथील क्र ांतिवीर भगत मास्तर यांचे पुत्र भरत भगत आणि धनेश राणे यांच्या संकल्पनेतून या नवीन पर्वाला सुरवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने युवक, शिक्षकवृंद, समाजसेवक शहिदांचे स्मरण म्हणून एक दिवा तेवण्याकरिता उपस्थित होते. यावेळी क्र ांतीवीर भगत मास्तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत भगत, कल्पेश डुकरे आदिंनी हुतात्म्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. क्रांतीवीर भगत मास्तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत भगत, मानिवली ग्रामपंचायत सदस्य प्रशांत झांजे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)>नवीन पर्व सुरूवीर भाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील तसेच क्रांतिवीरांचे स्मरण व्हावे आणि सिद्धगडचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहावा, या निमित्ताने पवित्र वीरभूमी सिद्धगड येथे प्रथमच दीपावलीनिमित्त दिवे रोषणाईचा उत्सव हा शहिदांचे स्मरण म्हणून कर्जत तालुक्यातील अवसरे येथील क्रांतीवीर भगत मास्तर यांचे सुपुत्र भरत भगत अणि धनेश राणे यांच्या संकल्पनेतून या नवीन पर्वाला सरुवात करण्यात आली. रविवारी रात्री १२ वाजता पणत्या लावून संपूर्ण परिसर रोषणाईने उजळून निघाला होता. >सैनिकांसाठी दीपोत्सवकर्जत : कर्जतकरांच्यावतीने पाडव्याच्या संध्याकाळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांकरिता पणती लावून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांच्या हस्ते भारतमातेच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून व पहिली पणती त्यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश लाड, मिलिंद चिखलकर, अशोक ओसवाल, नगरसेविका सुवर्णा जोशी आदी उपस्थित होते. प्रत्येकाने एक पणती पेटवून सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांकरिता दीपोत्सव साजरा केला. कार्यक्र माचे आयोजन भाजपाचे राहुल कुलकर्णी यांनी केले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.