शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

शेतकऱ्यांशी १५ वर्षांत पहिल्यांदाच थेट चर्चा

By admin | Updated: June 5, 2017 04:58 IST

शेतकरी संपावर यशस्वी तोडगा निघाल्यानंतरच संप मागे घेण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संपावर यशस्वी तोडगा निघाल्यानंतरच संप मागे घेण्यात आला. १५ वर्षांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट चर्चा करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवित असल्याने व आश्वासक योजना राबवित असल्याने समितीच्या सदस्यांनी संप मागे घेतला, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. राज्य सरकार शेतीमध्ये अनेक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. आधीच्या सरकारने थकविलेले ठिबक सिंचनाचे अनुदान आम्ही दिले. नाबार्ड अंतर्गत ऊस उत्पादकांना ठिंबक सिंचनासाठी केवळ २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा केला जात आहे. बाकी व्याज सरकार भरणार आहे. सुमारे ३ लाख हेक्टर क्षेत्रावर सिंचन केले जाणार आहे, असे खोत यांनी सांगितले. अपघात विम्यापोटी साडेचार लाख शेतकऱ्यांना आरोग्य सहाय्यता निधीतून ६०० कोटी रुपये दिले. जिल्हावार आढावा घेऊन कर्जमाफीत दुष्काळी भाग व आत्महत्याग्रस्त पट्ट्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहोत, असे ते म्हणाले.मग परदेशात चर्चा करणार का?सरकार संवेदनशील असल्यानेच शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. मात्र, काही घटक लोकांच्या मनात द्वेष पसरवित आहेत. राज्यात अराजकता निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा का केली, असे ते विचारतात. मग चर्चा करण्यास ते परदेशात जाणार आहेत का, असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रश्न केला.विदर्भ, मराठवाड्यासाठी स्वतंत्र योजनाविदर्भातील ६, मराठवाड्यातील ८ व खान्देशातील एक अशा १५ जिल्ह्यांत नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी ही जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून ५ हजार कोटींची योजना सरकार राबवित आहे. त्यात सिंचनापासून अनेक सुविधांचा समावेश आहे.