शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

शेतकऱ्यांशी १५ वर्षांत पहिल्यांदाच थेट चर्चा

By admin | Updated: June 5, 2017 04:58 IST

शेतकरी संपावर यशस्वी तोडगा निघाल्यानंतरच संप मागे घेण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संपावर यशस्वी तोडगा निघाल्यानंतरच संप मागे घेण्यात आला. १५ वर्षांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट चर्चा करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवित असल्याने व आश्वासक योजना राबवित असल्याने समितीच्या सदस्यांनी संप मागे घेतला, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. राज्य सरकार शेतीमध्ये अनेक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. आधीच्या सरकारने थकविलेले ठिबक सिंचनाचे अनुदान आम्ही दिले. नाबार्ड अंतर्गत ऊस उत्पादकांना ठिंबक सिंचनासाठी केवळ २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा केला जात आहे. बाकी व्याज सरकार भरणार आहे. सुमारे ३ लाख हेक्टर क्षेत्रावर सिंचन केले जाणार आहे, असे खोत यांनी सांगितले. अपघात विम्यापोटी साडेचार लाख शेतकऱ्यांना आरोग्य सहाय्यता निधीतून ६०० कोटी रुपये दिले. जिल्हावार आढावा घेऊन कर्जमाफीत दुष्काळी भाग व आत्महत्याग्रस्त पट्ट्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहोत, असे ते म्हणाले.मग परदेशात चर्चा करणार का?सरकार संवेदनशील असल्यानेच शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. मात्र, काही घटक लोकांच्या मनात द्वेष पसरवित आहेत. राज्यात अराजकता निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा का केली, असे ते विचारतात. मग चर्चा करण्यास ते परदेशात जाणार आहेत का, असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रश्न केला.विदर्भ, मराठवाड्यासाठी स्वतंत्र योजनाविदर्भातील ६, मराठवाड्यातील ८ व खान्देशातील एक अशा १५ जिल्ह्यांत नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी ही जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून ५ हजार कोटींची योजना सरकार राबवित आहे. त्यात सिंचनापासून अनेक सुविधांचा समावेश आहे.