शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

आधी "ही" आरक्षणं तर बंद करा- मीरा कुमार

By admin | Updated: June 30, 2017 19:11 IST

पाच हजार वर्षांपासून देशात चालत आलेल्या आरक्षणाच्या व्यवस्थेला माझा विरोध आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 30 - पाच हजार वर्षांपासून देशात चालत आलेल्या आरक्षणाच्या व्यवस्थेला माझा विरोध आहे. कपडे धुणारे, मैला वाहणारे आणि चर्मकार या गोष्टी एकाच समाजाने करायच्या, पूजा मात्र विशिष्ट समाजानेच करायची, आधी हे आरक्षण रद्द करा मग इतर आरक्षणाकडे आपण वळू, असं यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार म्हणाल्या आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ)च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार, माजी लोकसभा सभापती मीरा कुमार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, नारायण राणे, संजय निरुपम, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, धनंजय मुंडे, सपाचे अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, आदी नेते उपस्थित होते. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र आणि मुंबईत येऊन मला आनंद वाटतोय. महाराष्ट्राची स्वतःची महान परंपरा आहे. स्वातंत्र्य आंदोलन आणि त्यानंतर राष्ट्र उभारणीत महाराष्ट्रानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र विकासाच्या शिखरावर पोहचावे ही माझी कामना आहे. 17 विरोधी पक्षांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली मला राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित केले. ही विरोधी पक्षांची एकजूट मूल्य आणि तत्त्वांवर आधारित आहे. दलित विरुद्ध दलित अशी लढाई बनली आहे. आजवर जेव्हा उच्चवर्णीय उमेदवार होते, तेव्हा त्यांच्या गुणाची, अनुभवाची चर्चा झाली. या निवडणुकीत कोविंदजी आणि मी निवडणुकीत उभे आहोत तर फक्त आमच्या जातीची चर्चा होत आहे, ही बाब योग्य नाही.