शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

विभाजनाच्या दिशेने पहिले पाऊल

By admin | Updated: April 25, 2015 01:59 IST

: राज्यातील वीज वितरण कंपनीचे (महावितरण) विभाजन करण्याचा राज्य शासनाचा विचार असून, त्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यात आले आहे

नागपूर : राज्यातील वीज वितरण कंपनीचे (महावितरण) विभाजन करण्याचा राज्य शासनाचा विचार असून, त्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना इतर राज्यांचा दौरा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.वीज वितरण कंपनीचे विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र अशा चार प्रादेशिक भागांत विभाजन होणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते. याकडे बावनकुळे यांचे लक्ष वेधण्यात आले असता ते म्हणाले की, याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात विभागनिहाय वीज वितरण कंपन्या आहेत.त्याच धर्तीवर राज्यात विभाजन करण्याचा विचार आहे. यामुळे कोणत्या भागात किती वीज उपलब्ध होते, किती ‘लॉस’ होतो, शासनाच्या अनुदानाचा कोणत्या विभागाला लाभ होतो हे कळून येईल. विभाजनाचा निर्णय फक्त महावितरणच्या संदर्भातच आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. वीज वितरण फ्रेन्चाईझी एसएनडीएलच्या संदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी दोन सदस्यीय सत्यशोधन समिती नियुक्त करण्यात आली असून, ती रविभवन येथे काम करणार आहे. एसएनडीएलच्या संदर्भातील सुमारे ४५० तक्रारींची तपासणी आणि कराराची अंमलबजावणी याबाबत ही समिती अहवाल देणार आहे. (प्रतिनिधी)