शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

सोमवारी पहिल्या राउंडची सोडत

By admin | Updated: March 4, 2017 03:37 IST

आरटीई अर्थात राइट टू एज्युकेशनअंतर्गत खाजगी शाळेत २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

सुरेश लोखंडे,ठाणे- दुर्बल व वंचित घटकांच्या कुटुंबातील बालकांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आरटीई अर्थात राइट टू एज्युकेशनअंतर्गत खाजगी शाळेत २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील ८११ शाळांमधील १६ हजार ४५५ जागांसाठी आॅनलाइन केवळ आठ हजार ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिलीच्या वर्गासह ज्युनिअर केजी आणि नर्सरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी ६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता लॉटरी पद्धतीने सोडत काढली जाणार आहे.या सोडतीद्वारे नशीब काढणाऱ्या बालकांना महागड्या शाळेत विनामूल्य शिक्षण घेता येणार आहे. या लॉटरी सोडत पद्धतीने दुर्बल व वंचित घटकातील बालकांना २०१७-१८ या वर्षासाठी प्रवेश मिळणार आहेत. येथील कोर्टनाक्याजवळील ठाणे पोलीस स्कूल, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे ही सोडत काढली जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले. एप्रिलअखेरपर्यंत लॉटरी सोडतचे सुमारे पाच राउंड काढले जातील. यातील पहिला राउंड सोमवारी आहे. यादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली उत्तम दर्जाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह अन्यही भाषिक शाळांमध्ये हा प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये सीबीएससी बोर्ड, एसएससी बोर्ड, आयसीएसई, आयबी आदी प्रकारच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित या आठ हजार ११ शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश निश्चित केले आहेत.पहिलीसह ज्युनिअर केजी व नर्सरीच्या वर्गामधील १६ हजार ४५५ जागांसाठी केवळ आठ हजार ५२ अर्ज आले आहेत. प्रवेश देऊनही जागा रिक्त राहणार असल्याचे प्राप्त अर्जावरून उघड होत आहे. यासाठी एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे व दुर्बल घटकामध्ये मोडणारे, अपंग, एसटी, एससी प्रवर्गातील बालकांना या महागड्या खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे. >महापालिका शाळांत मिळणार मोफत प्रवेशअंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर या तालुक्यांसह मीरा-भार्इंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई आणि भिवंडी या महापालिकांमधील शाळांमध्ये विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. ५९७ शाळांमध्ये पहिलीच्या वर्गामध्ये १२ हजार ६०५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. यासाठी तर ८७ ज्युनिअर केजीच्या शाळांमध्ये एक हजार ७९७ आणि १२८ नर्सरी शाळांमध्ये दोन हजार ५३ विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.