शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

आधी राजीनामे, मगच कामकाज

By admin | Updated: July 25, 2015 01:22 IST

राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि शैक्षणिक अर्हतेबाबत खोटी माहिती दिल्याचे आरोप आहेत. यासंदर्भात ठोस पुरावेदेखील

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि शैक्षणिक अर्हतेबाबत खोटी माहिती दिल्याचे आरोप आहेत. यासंदर्भात ठोस पुरावेदेखील सादर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री चौकशीपूर्वीच संबंधित मंत्र्यांना क्लीन चिट देत असून, संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत, तोवर सभागृहाचे कामकाज न चालू देण्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, अनेक मंत्र्यांवर सबळ पुराव्यानिशी भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. अनेक मंत्र्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्ता दडविल्याचे स्पष्ट झाले आहे. काही मंत्र्यांच्या शैक्षणिक अर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणांची चौकशी करण्याऐवजी संबंधितांना ‘क्लीन चिट’ देण्याचा सपाटा मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. भ्रष्टाचार व इतर आरोपांची चौकशी करण्यास सरकार तयार असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही. आरोप असलेले मंत्री पदावर राहणार असतील तर ती चौकशी निष्पक्ष होऊ शकणार नाही. त्यामुळे संबंधित मंत्र्यांचे तातडीने राजीनामे घेऊन त्यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)