शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पहिला सामना होणार : उर्वरित १९ सामन्यांचे भवितव्य टांगणीला

By admin | Updated: April 8, 2016 02:21 IST

राज्यात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न सतावत असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियमवर होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीवरून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनला तात्पुरता दिलासा

मुंबई : राज्यात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न सतावत असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियमवर होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीवरून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्याला उच्च न्यायालायाने परवानगी दिली असली तरी उर्वरित १९ सामन्यांचा निर्णय १२ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी खेळपट्टीसाठी वापण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती न्या. व्ही.एम. कानडे व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाला दिली. ‘खेळपट्ट्यांची देखभाल करण्यासाठी पाणी द्यायचे नसेल, तर बगिच्यांची देखभाल करण्यासाठीही पाणी देणे थांबविले पाहिजे,’ असे एमसीएच्या वकिलांनी म्हटले. या युक्तिवादावर खंडपीठाने संताप व्यक्त केला. राज्य सरकारने या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय नियोजन केले आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले. आयपीएलला टँकरने पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या स्रोतांची चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. (प्रतिनिधी)राज्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई असताना आयपीएलसाठी एवढे मोठे पाणी टँकरने कसे मिळणार? या टँकरना कोण पाणी देणार? हे प्रश्न राज्य सरकारला पडले नाहीत का? राज्य सरकारने स्वत:हून याची दखल घेऊन महापालिकेकडे आणि एमसीएकडे चौकशी करायला हवी होती, असे ताशेरे खंडपीठाने राज्य सरकारवर ओढले.खासगी विहिरी आणि बोअरवेल ताब्यात घेण्याचा विचार : आवश्यकता भासल्यास खासगी विहिरी आणि बोअरवेलही ताब्यात घेण्याचा विचार सरकार करत आहे. खंडपीठानेही राज्य सरकारला या विचाराबाबत अंतिम निर्णय काय असेल, याची माहिती १२ एप्रिल रोजी देण्याचे निर्देश दिले.