शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

पहिला सामना होणार : उर्वरित १९ सामन्यांचे भवितव्य टांगणीला

By admin | Updated: April 8, 2016 02:21 IST

राज्यात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न सतावत असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियमवर होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीवरून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनला तात्पुरता दिलासा

मुंबई : राज्यात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न सतावत असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियमवर होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीवरून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्याला उच्च न्यायालायाने परवानगी दिली असली तरी उर्वरित १९ सामन्यांचा निर्णय १२ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी खेळपट्टीसाठी वापण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती न्या. व्ही.एम. कानडे व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाला दिली. ‘खेळपट्ट्यांची देखभाल करण्यासाठी पाणी द्यायचे नसेल, तर बगिच्यांची देखभाल करण्यासाठीही पाणी देणे थांबविले पाहिजे,’ असे एमसीएच्या वकिलांनी म्हटले. या युक्तिवादावर खंडपीठाने संताप व्यक्त केला. राज्य सरकारने या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय नियोजन केले आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले. आयपीएलला टँकरने पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या स्रोतांची चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. (प्रतिनिधी)राज्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई असताना आयपीएलसाठी एवढे मोठे पाणी टँकरने कसे मिळणार? या टँकरना कोण पाणी देणार? हे प्रश्न राज्य सरकारला पडले नाहीत का? राज्य सरकारने स्वत:हून याची दखल घेऊन महापालिकेकडे आणि एमसीएकडे चौकशी करायला हवी होती, असे ताशेरे खंडपीठाने राज्य सरकारवर ओढले.खासगी विहिरी आणि बोअरवेल ताब्यात घेण्याचा विचार : आवश्यकता भासल्यास खासगी विहिरी आणि बोअरवेलही ताब्यात घेण्याचा विचार सरकार करत आहे. खंडपीठानेही राज्य सरकारला या विचाराबाबत अंतिम निर्णय काय असेल, याची माहिती १२ एप्रिल रोजी देण्याचे निर्देश दिले.