शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पहिला सामना होणार : उर्वरित १९ सामन्यांचे भवितव्य टांगणीला

By admin | Updated: April 8, 2016 02:21 IST

राज्यात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न सतावत असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियमवर होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीवरून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनला तात्पुरता दिलासा

मुंबई : राज्यात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न सतावत असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियमवर होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीवरून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्याला उच्च न्यायालायाने परवानगी दिली असली तरी उर्वरित १९ सामन्यांचा निर्णय १२ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी खेळपट्टीसाठी वापण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती न्या. व्ही.एम. कानडे व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाला दिली. ‘खेळपट्ट्यांची देखभाल करण्यासाठी पाणी द्यायचे नसेल, तर बगिच्यांची देखभाल करण्यासाठीही पाणी देणे थांबविले पाहिजे,’ असे एमसीएच्या वकिलांनी म्हटले. या युक्तिवादावर खंडपीठाने संताप व्यक्त केला. राज्य सरकारने या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय नियोजन केले आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले. आयपीएलला टँकरने पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या स्रोतांची चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. (प्रतिनिधी)राज्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई असताना आयपीएलसाठी एवढे मोठे पाणी टँकरने कसे मिळणार? या टँकरना कोण पाणी देणार? हे प्रश्न राज्य सरकारला पडले नाहीत का? राज्य सरकारने स्वत:हून याची दखल घेऊन महापालिकेकडे आणि एमसीएकडे चौकशी करायला हवी होती, असे ताशेरे खंडपीठाने राज्य सरकारवर ओढले.खासगी विहिरी आणि बोअरवेल ताब्यात घेण्याचा विचार : आवश्यकता भासल्यास खासगी विहिरी आणि बोअरवेलही ताब्यात घेण्याचा विचार सरकार करत आहे. खंडपीठानेही राज्य सरकारला या विचाराबाबत अंतिम निर्णय काय असेल, याची माहिती १२ एप्रिल रोजी देण्याचे निर्देश दिले.