शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अकरावीच्या पहिल्या यादीलाच ‘लेटमार्क’

By admin | Updated: July 11, 2017 05:49 IST

अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत नाव येते की नाही? याची वाट पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या पदरी सोमवारी निराशाच पडली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत नाव येते की नाही? याची वाट पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या पदरी सोमवारी निराशाच पडली. सायंकाळी ५ वाजता अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आले होते. पण, कंपनीने योग्य पद्धतीने आणि नियोजनबद्धपणे काम न केल्याचा फटका म्हणून रात्री १२ वाजेपर्यंत यादीच जाहीर झाली नाही. रात्री उशिरापर्यंत यादी जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पहिल्या यादीत नाव लागते की नाही हे पाहण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय गाठले होते. सायंकाळी ५ वाजता यादी जाहीर न झाल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयातील फोन खणाणू लागला होता. तांत्रिक कारणांमुळे सायंकाळी ५ वाजता गुणवत्ता यादी जाहीर न करता, सायंकाळी ७ वाजता यादी जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. थोड्याच वेळात निकाल रात्री उशिरा लागणार अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरचा रस्ता धरला. सोमवारी दुपारपासून कंपनीने डेटा अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू केली. विद्यार्थी अधिक असल्याने डेटा अपलोड व्हायला वेळ लागत आहे. त्यामुळे ७ वाजताचीही डेडलाइन पुढे ढकलून थेट १२वर गेली. यादी अपलोड होण्यास तांत्रिक अडथळे येत असल्याने ही वेळ आल्याचे शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र, विद्यार्थ्यांना मेसेजद्वारे प्रवेशाची सर्व माहिती देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी चिंता करू नये. मध्यरात्रीपर्यंत ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून प्रवेश सुरू होणार असून, कोणतीही काळजी न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर यासंदर्भात नायसा कंपनीशी संपर्क साधला असता यादी अपलोड होण्यास अडथळे झाल्याने हा प्रकार झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.कारवाईची मागणी अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत सातत्याने होत असलेला गोंधळ, कंपनीने डेडलाइन न पाळणे याचा गांभीर्याने विचार व्हावा. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी मनविसेचे चेतन पेडणेकर यांनी केली. कंपनीने योग्य नियोजन न केल्याने विद्यार्थी आणि पालक वेठीस धरले गेले असून शिक्षणमंत्र्यांनी या कंपनीवर कारवाई करण्याचे धाडस दाखविण्याचे आवाहन पेडणेकर यांनी केले.