शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरे कॉलनीत पहिले गोकूळग्राम

By admin | Updated: March 18, 2015 01:33 IST

गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या गोवंशाच्या देखभालीसाठी राज्यात चार ठिकाणी गोकूळग्राम प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

मुंबई : गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या गोवंशाच्या देखभालीसाठी राज्यात चार ठिकाणी गोकूळग्राम प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यासाठी लागणारा ९० कोटींचा निधी केंद्र सरकार देणार असल्याची माहिती पशू व दुग्धसंवर्धन मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यातील चार गोकूळग्रामना केंद्र सरकारने मान्यता दिली असून, मुंबईत आरे कॉलनीत १६ कोटी ९३ लाख, अमरावती येथे १७ कोटी ९० लाख, पुण्यातील ताथवडे येथे ३२ कोटी ३८ लाख तसेच पालघर येथील दापचेरी अशा चार ठिकाणी गोकूळग्राम योजना राबविण्यात येणार आहे. याशिवाय राज्यात अन्यत्र हजार गार्इंमागे एक गोकूळग्राम उभारण्यात येणार आहे. या गोकूळग्राम चालविणाऱ्या संस्थांना नाममात्र दरात गायरान जमिनी देण्यात येतील. तसेच सामाजिक वनीकरण, वने आदीतील कुरणे गोवंशाच्या चरणासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. शिवाय जैन धार्मिक संस्था, अहिंसावादी संघटनांसह स्वयंसेवी संस्थांनीही आर्थिक मदतीसह गोवंशाच्या रक्षणासाठी पुढाकाराची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती खडसे यांनी दिली. (प्रतिनिधी)महाराष्ट्राला केंद्राची सापत्न वागणूक केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार शेजारच्या देशांना अब्जावधीची मदत करते; मात्र राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायला तयार नाही, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेतील पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान केला. अलीकडेच मॉरिशसला ३२ अब्जची मदत करण्यात आली. श्रीलंका आणि अन्य छोट्या देशांनाही सढळ हाताने मदत करताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. राज्याने मदतीसाठी दोनवेळा पाठविलेले प्रस्ताव केंद्राने फेटाळले. अन्य राज्याचे मंत्री, अधिकारी दिल्लीतून मदत मिळवित असताना राज्य सरकार मात्र त्यात अपयशी ठरत आहे. मागील आठ दिवसांत गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचीही माहिती देऊन शेतकऱ्यांना मदत देताना प्रक्रियेत न अडकता तातडीने त्यांना मदत करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.