शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

देशातील पहिला शेतकरी संप रायगडमध्ये

By admin | Updated: June 2, 2017 03:19 IST

राज्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने देशभर खळबळ उडाली असताना रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी

नामदेव मोरे /लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने देशभर खळबळ उडाली असताना रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २५ आॅक्टोबर १९३३ मध्ये चरीकोपरमध्ये खोती पद्धतीविरोधात तब्बल सहा वर्षे जमीन न कसता केलेल्या शेतकरी संपाची आठवणी निघत आहेत. देशाच्या व कदाचित जगाच्या इतिहासामधील सर्वाधिक काळ सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप, म्हणूनही रायगडमधील या आंदोलनाची ओळख आहे. कोकणामध्ये शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्यापैकी ७५ टक्के वाटा खोतांनी मागितला होता. या अन्यायाविरोधात नारायण नागो पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबागजवळील चरीकोपर येथे शेतकरी परिषद झाली. जोपर्यंत कष्टाचा योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी शेती करणे बंद करावे, असे आवाहन नारायण पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या दिवसापासूनच संप जाहीर केला. शेतकऱ्यांचा संप टिकणार नाही. उपासमार सुरू झाली की शेती कसायला सुरुवात करतील, असे खोतांना वाटले  होते; परंतु शेतकरी निर्णयावर ठाम राहिले. मोलमजुरी करून, शहरात धुणीभांडी करून उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केली.