शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पावसाळी सहलींची पहिली पसंत ‘भंडारदरा’ : धबधब्यांचे माहेर

By अझहर शेख | Updated: August 1, 2017 16:07 IST

नाशिक, दि. 1-  मुंबईकर असो की नाशिककर आणि अहमदनगरवासीय पर्यटक पावसाळी सहलीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील 'भंडारदरा' या डेस्टिनेशनला पसंती देत ...

नाशिक, दि. 1-  मुंबईकर असो की नाशिककर आणि अहमदनगरवासीय पर्यटक पावसाळी सहलीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील 'भंडारदरा' या डेस्टिनेशनला पसंती देत आहेत. मुंबईपासून इगतपुरी-घोटी मार्गे नाशिक पासून तर अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर आणि संगमनेर, अकोले मार्गे अहमदनगर वासीयांनाही भंडारदरा जवळचे ठिकाण आहे.

‘विकेण्ड’ला सह्याद्रीच्या कुशीत जणू पर्यटकांची जत्राच भरलेली पहावयास मिळते. या डेस्टिनेशनमध्ये निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये तरुणाईची संख्या सर्वाधिक आहे. शाळा, महाविद्यालयीन सहली असो की ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळांचे पर्यटन असो अशा सर्वच वयोगटातील निसर्गप्रेमी पहिली पसंत भंडारदरा परिसराला देताना दिसून येत आहे.

वाऱ्यासह वेगाने कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, परिसराने पांघरलेला हिरवा शालू सह्याद्रीच्या रांगेतील पाबरगड, आजोबा, कळसुबाई शिखर, रतनगड, अलंग-मदन-कुलंग, खुट्टा अशा विविध गडांना चढलेला हिरवाईचा साज अन् या डोंगररांगांवर वरूणराजाकडून सुरू असलेला जलभिषेक त्यामुळे वाहणारे लहान-मोठे धबधबे निसर्गसौंदर्यात अधिकच भर घालतात.

भंडारदरा धरण अर्थात विल्सन डॅम शंभर टक्के भरले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याबररोबरच अम्ब्रेला फॉलही सध्या पर्यटकांच्या दृष्टीस पडत आहे. धरणातून सोडण्यात येणाºया पाण्यामुळे हा फॉल तयार होतो. हा वॉटरफॉल शेंडी गावालगत पहावयास मिळतो.तेथून पुढे रतनवाडी-घाटघरच्या परिसरात भटकंती करताना नाणे वॉटरफॉल, नेकलेस वॉटरफॉल साम्रद जवळील आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या सांदण व्हॅलीमधील रिव्हर्स फॉल तसेच भंडारदरापासून राजूरच्या रस्त्यावर पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रंधा गावालगत असलेल्या श्री घोरपडादेवीच्या परिसरातील रंधा वॉटरफॉलसह नदीचा विस्तीर्ण परिसर आणि मंदिर विश्वस्ताकडून बांधण्यात आलेले लहान-लहान आकर्षक पादचारी पूल तयार करून परिसर विकसीत करण्यात आला आहे. त्यामुळे भंडारदरा ‘ट्रीप’मधील ‘रंधा’ला भेट प्रत्येकाची ठरलेली असते. या भागात येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिक आदिवासींना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. पर्यटन स्थळावर परिसराती ग्राम विकास समिती व संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे स्थानिक युवकांना रोजगारासाठी विविध खाद्यपदार्थांची विक्री करणे सोपे झाले आहे.