शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

आधी गुजरातचे तुकडे करा!

By admin | Updated: April 9, 2016 04:03 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य राज्याचे चार तुकडे करा म्हणतात. कोण ते मागो वैद्य? काय मागू ते मिळेल काय, म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करणार.

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य राज्याचे चार तुकडे करा म्हणतात. कोण ते मागो वैद्य? काय मागू ते मिळेल काय, म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करणार. संघाने आधी गुजरातचे तुकडे करावेत, मग महाराष्ट्राचे बोलावे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संघाचा समाचार घेतला.गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज यांनी तब्बल ७ वर्षांनंतर शिवाजी पार्कवरील जाहीर सभा घेतली. एक तासाच्या भाषणात त्यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि एमएमआयएमच्या ओवैसी यांच्यावर सडकून टीका केली. राज्यात जाणीवपूर्वक विदर्भ आणि मराठवाडा वेगळा करण्याची भाषा केली जात आहे, असे सांगत सर्वाधिक काळ राज्यात आणि केंद्रात सत्ता भोगूनही विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांना त्यांच्या भागाचा विकास करता येत नसेल तर त्याचा दोष महाराष्ट्रावर कसा? इतका काळ सत्ता भोगूनही आपल्या भागाचा विकास करता येत नसेल तर खुर्च्या सोडा. पण तुमच्यासाठी महाराष्ट्र तोडू देणार नाही, असा इशाराही राज यांनी दिला. जे महाराष्ट्रात घडतेय तेच केंद्रात घडत आहे. मोदींनी गुजरातचा विकास केला म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण पंतप्रधान झाल्यापासून ते बदलून गेले. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्या मोदींनी केसाने गळा कापला, म्हणून आज मोदींवर टीका करीत आहे. सत्तेवर येताना भाजपाने ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखविली होती. आज काहीच घडत नसल्याने सत्ताधाऱ्यांचा नालायकपणा झाकण्यासाठी आरएसएसच्या आडून भावनिक मुद्दे उगाळले जात आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्या भाषणानंतर तीनवेळा ‘भारतमाता की जय’चा नारा द्यायच्या. भाजपा आणि संघाने देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटू नयेत, असा टोला राज यांनी लगावला.सोनारांच्या आंदोलनावर भाष्य करताना राज म्हणाले, विरोधात असताना हेच मोदी या अबकारी कराच्या विरोधात होते. ते म्हणाले होते की, हा कायदा आला तर सोनार आत्महत्या करतील. मग आता तोच कायदा का आणत आहात?देवेंद्र फडणवीस हे तर वर्गातील मॉनिटर आहेत. मुख्यमंत्री पदावरून काढले तरी भारतमाता की जय म्हणणार, असे ते म्हणाले. पण कोण काढतेय? काहीही बोलायचे! आधी राज्यात ज्या वाईट गोष्टी चालल्यात त्या बंद करा, असा टोला राज यांनी हाणला. गळ्यावर सुरा ठेवला तरी ‘भारतमाता की जय’ बोलणार नसल्याची भाषा ओवैसी करतो. इकडे महाराष्ट्रात ये फिरवून दाखवितो, असे म्हणत राज यांनी ओवैसींना लक्ष्य केले. भाजपाच्या पैशावर ओवैसींचा सारा कारभार चालू आहे, असा आरोपही राज यांनी केला.मनसेवर आंदोलन अर्धवट सोडण्याचा आरोप होतो. मराठी पाट्या, मराठी सिनेमे, रेल्वेतील मराठी टक्का आणि टोलसारखे आंदोलन मनसेने सत्ता नसतानाही यशस्वी केले. आंदोलन अर्धवट सोडल्याचा आरोप करणाऱ्यांनी राम मंदिर आंदोलनाचा खुलासा करावा.शिवसेनेच्या जैतापूर आंदोलनाचे काय झाले? असे विचारत शिवसेनेच्या भूमिकेचाही समाचार घेतला. सत्तेत राहायचे आणि रुसूबाई.. रुसूबाई करायचे. पटत नसेल तर सत्तेतून बाहेर व्हा. पण सत्ताही उबवायची आणि कोंबडेही खायचे, असा हा प्रकार आहे.