शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आधी गुजरातचे तुकडे करा!

By admin | Updated: April 9, 2016 04:03 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य राज्याचे चार तुकडे करा म्हणतात. कोण ते मागो वैद्य? काय मागू ते मिळेल काय, म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करणार.

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य राज्याचे चार तुकडे करा म्हणतात. कोण ते मागो वैद्य? काय मागू ते मिळेल काय, म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करणार. संघाने आधी गुजरातचे तुकडे करावेत, मग महाराष्ट्राचे बोलावे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संघाचा समाचार घेतला.गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज यांनी तब्बल ७ वर्षांनंतर शिवाजी पार्कवरील जाहीर सभा घेतली. एक तासाच्या भाषणात त्यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि एमएमआयएमच्या ओवैसी यांच्यावर सडकून टीका केली. राज्यात जाणीवपूर्वक विदर्भ आणि मराठवाडा वेगळा करण्याची भाषा केली जात आहे, असे सांगत सर्वाधिक काळ राज्यात आणि केंद्रात सत्ता भोगूनही विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांना त्यांच्या भागाचा विकास करता येत नसेल तर त्याचा दोष महाराष्ट्रावर कसा? इतका काळ सत्ता भोगूनही आपल्या भागाचा विकास करता येत नसेल तर खुर्च्या सोडा. पण तुमच्यासाठी महाराष्ट्र तोडू देणार नाही, असा इशाराही राज यांनी दिला. जे महाराष्ट्रात घडतेय तेच केंद्रात घडत आहे. मोदींनी गुजरातचा विकास केला म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण पंतप्रधान झाल्यापासून ते बदलून गेले. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्या मोदींनी केसाने गळा कापला, म्हणून आज मोदींवर टीका करीत आहे. सत्तेवर येताना भाजपाने ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखविली होती. आज काहीच घडत नसल्याने सत्ताधाऱ्यांचा नालायकपणा झाकण्यासाठी आरएसएसच्या आडून भावनिक मुद्दे उगाळले जात आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्या भाषणानंतर तीनवेळा ‘भारतमाता की जय’चा नारा द्यायच्या. भाजपा आणि संघाने देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटू नयेत, असा टोला राज यांनी लगावला.सोनारांच्या आंदोलनावर भाष्य करताना राज म्हणाले, विरोधात असताना हेच मोदी या अबकारी कराच्या विरोधात होते. ते म्हणाले होते की, हा कायदा आला तर सोनार आत्महत्या करतील. मग आता तोच कायदा का आणत आहात?देवेंद्र फडणवीस हे तर वर्गातील मॉनिटर आहेत. मुख्यमंत्री पदावरून काढले तरी भारतमाता की जय म्हणणार, असे ते म्हणाले. पण कोण काढतेय? काहीही बोलायचे! आधी राज्यात ज्या वाईट गोष्टी चालल्यात त्या बंद करा, असा टोला राज यांनी हाणला. गळ्यावर सुरा ठेवला तरी ‘भारतमाता की जय’ बोलणार नसल्याची भाषा ओवैसी करतो. इकडे महाराष्ट्रात ये फिरवून दाखवितो, असे म्हणत राज यांनी ओवैसींना लक्ष्य केले. भाजपाच्या पैशावर ओवैसींचा सारा कारभार चालू आहे, असा आरोपही राज यांनी केला.मनसेवर आंदोलन अर्धवट सोडण्याचा आरोप होतो. मराठी पाट्या, मराठी सिनेमे, रेल्वेतील मराठी टक्का आणि टोलसारखे आंदोलन मनसेने सत्ता नसतानाही यशस्वी केले. आंदोलन अर्धवट सोडल्याचा आरोप करणाऱ्यांनी राम मंदिर आंदोलनाचा खुलासा करावा.शिवसेनेच्या जैतापूर आंदोलनाचे काय झाले? असे विचारत शिवसेनेच्या भूमिकेचाही समाचार घेतला. सत्तेत राहायचे आणि रुसूबाई.. रुसूबाई करायचे. पटत नसेल तर सत्तेतून बाहेर व्हा. पण सत्ताही उबवायची आणि कोंबडेही खायचे, असा हा प्रकार आहे.