शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

वक्तृत्व स्पर्धेत कल्याणच्या श्रद्धा वझे प्रथम

By admin | Updated: April 27, 2016 03:53 IST

साने गुरु जी वाचनालयाने घेतलेल्या वकृत्त्व स्पर्धेत यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता आपल्या स्पर्धकांनी वकृत्त्वातूनदेखील याच विषयावर भाष्य करणे पसंत केले

ठाणे : साने गुरु जी वाचनालयाने घेतलेल्या वकृत्त्व स्पर्धेत यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता आपल्या स्पर्धकांनी वकृत्त्वातूनदेखील याच विषयावर भाष्य करणे पसंत केले. या स्पर्धेत कल्याणच्या श्रद्धा वझे यांनी बाजी मारली. नेरळच्या दर्पण गाडे यांनी द्वितीय, खारीगावच्या गणेश बिडये यांनी तृतीय क्रमांक पटकाविला तर उत्तेजनार्थ म्हणून कमलाकर गुर्जर व उषा साठे यांची निवड झाली. परिक्षक म्हणून कवी नारायण लाळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी ‘दुष्काळ मानव निर्मित की निसर्ग निर्मित’, ‘इंग्रजी माध्यम आणि डिजिटायझेनचा वाचनालयांवर परिणाम होईल का?’, सन २०१५ मध्ये प्रकाशित झालेले आणि मला आवडलेले पुस्तक आदी विषय दिले होते. स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी आपला उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला. दुष्काळासाठी माणूस जबाबदार आहे. पूर्वी पूर्ण चार महिने पाऊस पडायचा. आता हे प्रमाणात व्यस्त आणि अनियमति झाले आहे. मध्येच अवकाळी पाऊस येतो. पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याचे नियोजन , सिंचन प्रकल्पांची कल्पकता दाखिवली नाही. वृक्षांची बेसुमार कत्तल, जमिनीची प्रचंड धूप, पाणी वापराबाबतचा बेफिकीरपणा अशा अनेक कारणांमुळे दुष्काळ परत परत येत आहे. भविष्यात पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल. हे भीषण संकट दूर करायचे असेल तर नियोजन आताच केले पाहिजे. प्रत्येकाने सहकार्य आणि शिस्त दाखिवली पाहिजे अशी विविध मते या विषयावर स्पर्धकांनी व्यक्त केली. पहिला दुष्काळ इ.पू, ६४६ साली रोममध्ये पडला होता. त्यानंतर इ,स. ६४२ मध्ये इजिप्तमध्ये पडल्याचीही माहिती दिली. राजेंद्रसिंह यांनी राजस्थानात केलेली जलक्र ांती, पोपटराव पवार,अण्णा हजारे यांनी केलेले शिवारातीला प्रयोग, यांचा आदर्श समोर ठेवून नियोजन करण्यात प्रत्येकाने सहभाग दिला पाहिजे अशी उपाययोजनाही या स्पर्धेतून सुचविण्यात आली. (प्रतिनिधी)