शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

आधी खाते क्रमांक, नंतरच मदत!

By admin | Updated: April 21, 2015 00:24 IST

दुष्काळग्रस्त शेतक-यांचा परत गेलेला निधी पुन्हा मागणार.

संतोष येलकर/अकोला : बँक खाते क्रमांकाअभावी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा शासनाकडे परत गेलेला मदतनिधी पुन्हा मागविला जाणार आहे. या मदतनिधीची मागणी शासनाकडे करण्यापूर्वी राज्यात दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खातेक्रमांकाचा शोध महसूल विभागाकडून घेतला जात आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यात खरीप पिके हातून गेली. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी राज्य शासनामार्फत जिल्हानिहाय मदतनिधी वितरित करण्यात आला. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेली मदत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी मदतनिधी तालुकास्तरावर वितरित करण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याचे काम काम तहसील कार्यालयांकडून करण्यात आले. राज्यातील दुष्काळग्रस्त जिलंमध्ये २0 मार्चपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर मदतनिधी जमा करण्याचे काम महसूल विभागामार्फत करण्यात आले होते. बँक खातेक्रमांक उपलब्ध नसलेल्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीचा निधी शासनाच्या आदेशानुसार २0 मार्च रोजीच जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत शासनाकडे परत करण्यात आला. बँक खाते क्रमांकाअभावी शासनाकडे सर्मपित करण्यात आलेला मदतनिधी पुन्हा शासनाकडून प्राप्त करण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये संबंधित दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचे बँक खातेक्रमांक प्राप्त करण्याचे काम महसूल यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले. तहसीलनिहाय शेतकर्‍यांचे बँक खातेक्रमांक उपलब्ध प्राप्त झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या मदतीसाठी मदतनिधीची जिल्हानिहाय मागणी करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमांकाअभावी शासनाकडे सर्मपित करण्यात आलेला मदतनिधी आवश्यक असल्याची मागणी शासनाकडे करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत ९ एप्रिल रोजी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांना पत्राद्वारे देण्यात आले आहेत. त्यानुसार दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमांकांचा शोध घेतला जात आहे.