शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

फायरिंग रेंजमधील गोळीबाराने पवईकरांच्या जीवाला धोका?

By admin | Updated: July 11, 2015 01:51 IST

घाटकोपर फायरिंग रेंजमधून होणाऱ्या गोळीबारामुळे पवईकरांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. या फैरी अडविण्यासाठी अडथळे (बॅफल रेंज) उभारण्याचे काम

डिप्पी वांकाणी, मुंबईघाटकोपर फायरिंग रेंजमधून होणाऱ्या गोळीबारामुळे पवईकरांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. या फैरी अडविण्यासाठी अडथळे (बॅफल रेंज) उभारण्याचे काम संबंधित ठेकेदाराने थांबविल्याने बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्या फायरिंग रेंजबाहेर धडकण्याचा धोका आजही कायम आहे. या फायरिंग रेंज लगतच्या वस्तीतील घरे आणि कारच्या तावदानावर बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या धडकल्याच्या काही घटना घडल्या आहेत.अशा घटना घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी अडथळे उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार सरकारने यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या प्रकल्पाचा ‘लोकमत’ने मागोवा घेतला असता हे काम थांबल्याचे उघडकीस आले. या प्रकल्पाचा खर्च चौपटीने वाढला असून सरकारने फेरअंदाजपत्रकानुसार निधी मंजुर न केल्याने हे काम थांबले आहे.२०१० मध्ये या प्रकल्पाचे सरकारपुढे सादरीकरण करणाऱ्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अशा घटनांमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. केंद्रीय प्रक्षेपी (बॅलिस्टीक) संशोधन प्रयोगशाळा आणि चंदीगडस्थित उत्तर विभागीय परिक्षेत्राला भेट देऊन आम्ही बॅफल रेंज संरचेनाचा अभ्यास केला. सोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंतेही होते. अभ्यासाअंती आम्ही घाटकोपर फायरिंगमध्ये उभारण्यात येणाऱ्या बॅफल रेंजसंबंधीचा प्रस्ताव सरकारला दिला. त्यानुसार सरकारने निधी मंजूर करून पैसेही दिले होते.बंदुकीतून उसळी घेत गोळ्या गोळीबारी मैदानातून बाहेर सूसाट निघतात. बंदुकीतून १६ अंशानी गोळ्यांनी उसळी घेतलेली असेल तर या गोळीबारी मैदानाभोवतालच्या टेकड्यामुळे गोळ्या अडल्या जाऊ शकतात; परंतु, एखाद्याने जाणीवपूर्वक आणि खोडसाळपणाने फैरी झाडल्यास गोळीबारी मैदानाबाहेर गोळ्या जातील. ४५ अंशापर्यंत उसळी घेतल्यानंतरही गोळ्या या मैदानाबाहेर जाणार नाहीत, अशा पद्धतीने अटकाव घालणाऱ्या कठड्याची (बॅफल रेंज) रचना तयार केली होती. ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते, त्याने ३० टक्केच काम केले. सुधारित अंदाजपत्रकाला सरकारने मंजुरी दिली नाही. ३ कोटीतून ठेकेदाराने होईल तेवढेच काम केले. तथापि, संरचना बदलल्याने हा खर्च १२ कोटींच्या घरात गेला. सरकारने अजुनही आमच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी न दिल्याने हे काम रखडले आहे, असे संजय पाटील (अभियंता, पीडब्ल्यूडी) यांनी सांगितले.