शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

शंभर एकरावरील बागांचे सरपण

By admin | Updated: April 22, 2016 04:11 IST

तुळजापूर-सोलापूर महामार्गापासून १२ कि.मी. अंतरावर असलेले जळकोटवाडी (ता. तुळजापूर) हे गाव द्राक्ष निर्यातीसाठी प्रसिद्ध.

संतोष मगर,  तामलवाडी (ता. तुळजापूर)तुळजापूर-सोलापूर महामार्गापासून १२ कि.मी. अंतरावर असलेले जळकोटवाडी (ता. तुळजापूर) हे गाव द्राक्ष निर्यातीसाठी प्रसिद्ध. मात्र, गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे शंभर एकरावरील द्राक्षबागांचे अक्षरश: सरपण झाले आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याची परिस्थितीही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.जळकोटवाडीकरांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. ज्वारी, हरभरा गहू या पिकांसोबतच येथे फळबागांचे क्षेत्रही मोठे आहे. मात्र, गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतीव्यवसाय धोक्यात आला. काही बागायतदार बाहेरगावाहून टँकरद्वारे पाणी आणून बागा जगविण्याचा प्रयत्न करीत असले तरी जवळपास शंभर एकरावरील बागा पूर्णत: वाया गेल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी या बागा मोडण्यास सुरुवातही केली आहे.गावचा पाणीप्रश्न मार्गी लागावा यासाठी सहा वर्षांपूर्वी येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र, यातील विहीर व पाइपलाइनचे काम मार्गी लागले असले तरी, टाकीचे बांधकाम रखडले. सध्या गावातील विंधन विहिरींनीही तळ गाठला असून चार दिवसांनी अर्धा तास विद्युत पंप चालत असल्याने ते पाणी जिल्हा परिषद शाळेजवळील पुरातन आडात सोडण्यात येते. गावकरी येथून घागरीने हे पाणी उपसून तहान भागवितात. गावात चार हातपंप असले तरी त्यातील तीन हातपंप कोरडे आहेत. शिवाय २०५ विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. > गावात लहान-मोठी अशी ७८० जनावरे असून, महिनाभर पुरेल एवढा चारा शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांना पाण्यासोबतच चाराटंचाईचादेखील सामना करावा लागणार आहे. कामाअभावी मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र येथे दिसते. जळकोटवाडीत जवळपास दोनशे मजूर असून, यातील ११३ जणांकडे जॉबकार्ड आहे. परंतु, हाताला काम नाही. गावात नवीन विहीर, शेतरस्ते यांचे प्रस्ताव पाठविले असले तरी त्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने या मजुरांवर कामासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणीटंचाईमुळे गावात कोणतेही बांधकाम न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. विहिरीतील पाणीसाठा कमी झाला असल्याने चार दिवसांआड उपसा करून गावकऱ्यांची तहान भागविली जात असल्याचे सरपंच राजाभाऊ फंड यांनी सांगितले.अत्यल्प पावसामुळे दोन महिन्यांपूर्वीच विहिरी आटल्या. त्यामुळे हाताशी आलेल्या द्राक्षबागा वाळून गेल्या. जनावरे, फळबागा जगविण्याचे मोठे आव्हान या दुष्काळाने उभे केले आहे. मन घट्ट करून वाळलेल्या बागांवर कुऱ्हाड चालवावी लागत असल्याची खंत शेतकरी रामचंद्र बोबडे यांनी व्यक्त केली. गावासाठी स्वतंत्र जलस्रोत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.