शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

शंभर एकरावरील बागांचे सरपण

By admin | Updated: April 22, 2016 04:11 IST

तुळजापूर-सोलापूर महामार्गापासून १२ कि.मी. अंतरावर असलेले जळकोटवाडी (ता. तुळजापूर) हे गाव द्राक्ष निर्यातीसाठी प्रसिद्ध.

संतोष मगर,  तामलवाडी (ता. तुळजापूर)तुळजापूर-सोलापूर महामार्गापासून १२ कि.मी. अंतरावर असलेले जळकोटवाडी (ता. तुळजापूर) हे गाव द्राक्ष निर्यातीसाठी प्रसिद्ध. मात्र, गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे शंभर एकरावरील द्राक्षबागांचे अक्षरश: सरपण झाले आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याची परिस्थितीही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.जळकोटवाडीकरांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. ज्वारी, हरभरा गहू या पिकांसोबतच येथे फळबागांचे क्षेत्रही मोठे आहे. मात्र, गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतीव्यवसाय धोक्यात आला. काही बागायतदार बाहेरगावाहून टँकरद्वारे पाणी आणून बागा जगविण्याचा प्रयत्न करीत असले तरी जवळपास शंभर एकरावरील बागा पूर्णत: वाया गेल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी या बागा मोडण्यास सुरुवातही केली आहे.गावचा पाणीप्रश्न मार्गी लागावा यासाठी सहा वर्षांपूर्वी येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र, यातील विहीर व पाइपलाइनचे काम मार्गी लागले असले तरी, टाकीचे बांधकाम रखडले. सध्या गावातील विंधन विहिरींनीही तळ गाठला असून चार दिवसांनी अर्धा तास विद्युत पंप चालत असल्याने ते पाणी जिल्हा परिषद शाळेजवळील पुरातन आडात सोडण्यात येते. गावकरी येथून घागरीने हे पाणी उपसून तहान भागवितात. गावात चार हातपंप असले तरी त्यातील तीन हातपंप कोरडे आहेत. शिवाय २०५ विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. > गावात लहान-मोठी अशी ७८० जनावरे असून, महिनाभर पुरेल एवढा चारा शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांना पाण्यासोबतच चाराटंचाईचादेखील सामना करावा लागणार आहे. कामाअभावी मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र येथे दिसते. जळकोटवाडीत जवळपास दोनशे मजूर असून, यातील ११३ जणांकडे जॉबकार्ड आहे. परंतु, हाताला काम नाही. गावात नवीन विहीर, शेतरस्ते यांचे प्रस्ताव पाठविले असले तरी त्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने या मजुरांवर कामासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणीटंचाईमुळे गावात कोणतेही बांधकाम न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. विहिरीतील पाणीसाठा कमी झाला असल्याने चार दिवसांआड उपसा करून गावकऱ्यांची तहान भागविली जात असल्याचे सरपंच राजाभाऊ फंड यांनी सांगितले.अत्यल्प पावसामुळे दोन महिन्यांपूर्वीच विहिरी आटल्या. त्यामुळे हाताशी आलेल्या द्राक्षबागा वाळून गेल्या. जनावरे, फळबागा जगविण्याचे मोठे आव्हान या दुष्काळाने उभे केले आहे. मन घट्ट करून वाळलेल्या बागांवर कुऱ्हाड चालवावी लागत असल्याची खंत शेतकरी रामचंद्र बोबडे यांनी व्यक्त केली. गावासाठी स्वतंत्र जलस्रोत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.