शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शंभर एकरावरील बागांचे सरपण

By admin | Updated: April 22, 2016 04:11 IST

तुळजापूर-सोलापूर महामार्गापासून १२ कि.मी. अंतरावर असलेले जळकोटवाडी (ता. तुळजापूर) हे गाव द्राक्ष निर्यातीसाठी प्रसिद्ध.

संतोष मगर,  तामलवाडी (ता. तुळजापूर)तुळजापूर-सोलापूर महामार्गापासून १२ कि.मी. अंतरावर असलेले जळकोटवाडी (ता. तुळजापूर) हे गाव द्राक्ष निर्यातीसाठी प्रसिद्ध. मात्र, गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे शंभर एकरावरील द्राक्षबागांचे अक्षरश: सरपण झाले आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याची परिस्थितीही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.जळकोटवाडीकरांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. ज्वारी, हरभरा गहू या पिकांसोबतच येथे फळबागांचे क्षेत्रही मोठे आहे. मात्र, गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतीव्यवसाय धोक्यात आला. काही बागायतदार बाहेरगावाहून टँकरद्वारे पाणी आणून बागा जगविण्याचा प्रयत्न करीत असले तरी जवळपास शंभर एकरावरील बागा पूर्णत: वाया गेल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी या बागा मोडण्यास सुरुवातही केली आहे.गावचा पाणीप्रश्न मार्गी लागावा यासाठी सहा वर्षांपूर्वी येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र, यातील विहीर व पाइपलाइनचे काम मार्गी लागले असले तरी, टाकीचे बांधकाम रखडले. सध्या गावातील विंधन विहिरींनीही तळ गाठला असून चार दिवसांनी अर्धा तास विद्युत पंप चालत असल्याने ते पाणी जिल्हा परिषद शाळेजवळील पुरातन आडात सोडण्यात येते. गावकरी येथून घागरीने हे पाणी उपसून तहान भागवितात. गावात चार हातपंप असले तरी त्यातील तीन हातपंप कोरडे आहेत. शिवाय २०५ विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. > गावात लहान-मोठी अशी ७८० जनावरे असून, महिनाभर पुरेल एवढा चारा शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांना पाण्यासोबतच चाराटंचाईचादेखील सामना करावा लागणार आहे. कामाअभावी मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र येथे दिसते. जळकोटवाडीत जवळपास दोनशे मजूर असून, यातील ११३ जणांकडे जॉबकार्ड आहे. परंतु, हाताला काम नाही. गावात नवीन विहीर, शेतरस्ते यांचे प्रस्ताव पाठविले असले तरी त्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने या मजुरांवर कामासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणीटंचाईमुळे गावात कोणतेही बांधकाम न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. विहिरीतील पाणीसाठा कमी झाला असल्याने चार दिवसांआड उपसा करून गावकऱ्यांची तहान भागविली जात असल्याचे सरपंच राजाभाऊ फंड यांनी सांगितले.अत्यल्प पावसामुळे दोन महिन्यांपूर्वीच विहिरी आटल्या. त्यामुळे हाताशी आलेल्या द्राक्षबागा वाळून गेल्या. जनावरे, फळबागा जगविण्याचे मोठे आव्हान या दुष्काळाने उभे केले आहे. मन घट्ट करून वाळलेल्या बागांवर कुऱ्हाड चालवावी लागत असल्याची खंत शेतकरी रामचंद्र बोबडे यांनी व्यक्त केली. गावासाठी स्वतंत्र जलस्रोत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.