शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

लागेल आग; तेव्हा येईल जाग

By admin | Updated: July 28, 2016 00:45 IST

सोमनाथ खताळ , जालना दुर्देवाने एखाद्या ठिकाणी आग लागली तर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्राथमिक उपाय म्हणून ठिकठिकाणी अग्निशमन यंत्र बसविण्यात आलेले आहेत.

सोमनाथ खताळ , जालनादुर्देवाने एखाद्या ठिकाणी आग लागली तर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्राथमिक उपाय म्हणून ठिकठिकाणी अग्निशमन यंत्र बसविण्यात आलेले आहेत. परंतु शासकीय कार्यालयातील हे यंत्र म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा अवस्थेत आहे. याबाबत कार्यालये अनभिज्ञ असून जेव्हा आग लागेल, तेव्हाच जाग येईल, अशी परिस्थिती बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघडकीस आली.शासकीय कार्यालयांत आग लागल्यास महत्वाचे दस्तोेवज आगीत खाक होण्याची दाट शक्यता असते. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यालयात प्राथमिक उपाय म्हणून अग्निशमन यंत्र असावे, असे आदेश दिले होते. हाच धागा पकडून जालना शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रांची काय परिस्थिती आहे? याचा आढावा घेतला असता अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.शहरातील अग्निशमन दल, वन परिक्षेत्र कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल कार्यालय, पोस्ट आॅफीस, नगर परिषद, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, समाजकल्याण कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांची पाहणी केली असता, काही कार्यालयांमध्ये हे अग्निशमन यंत्र धूळ खात पडल्याचे दिसून आले तर काही ठिकाणी केवळ शोभेची वास्तू म्हणून हे यंत्र भिंतीला लटकवण्यात आले होते.ना तपासणी, ना कारवाईहे यंत्र कार्यान्वित आहेत का? त्यांची परिस्थिती कशी आहे? याबाबत तपासणी करण्यास संबंधितांना वेळच नसल्याचे दिसते. त्यामुळे कारवाई करणे तर दूरच. यामुळेच शासकीय कार्यालयातील महत्वाचे दस्तावेज व कागदपत्रे धोक्यात आहेत.वन परिक्षेत्र कार्यालयाने झटकले हातयेथील कार्यालयात अग्निशमन यंत्र नसल्याचे वनक्षेत्र अधिकारी एम.आर.निकुंभ यांनी सांगितले. विशेष म्हणजे आपण मागणी केलेली नाही. यावरून हे कार्यालय आगीबाबत किती जागरूक आहे, हे यावरून स्पष्ट होते. इतरांचीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती.