शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

लागेल आग; तेव्हा येईल जाग

By admin | Updated: July 28, 2016 00:45 IST

सोमनाथ खताळ , जालना दुर्देवाने एखाद्या ठिकाणी आग लागली तर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्राथमिक उपाय म्हणून ठिकठिकाणी अग्निशमन यंत्र बसविण्यात आलेले आहेत.

सोमनाथ खताळ , जालनादुर्देवाने एखाद्या ठिकाणी आग लागली तर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्राथमिक उपाय म्हणून ठिकठिकाणी अग्निशमन यंत्र बसविण्यात आलेले आहेत. परंतु शासकीय कार्यालयातील हे यंत्र म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा अवस्थेत आहे. याबाबत कार्यालये अनभिज्ञ असून जेव्हा आग लागेल, तेव्हाच जाग येईल, अशी परिस्थिती बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघडकीस आली.शासकीय कार्यालयांत आग लागल्यास महत्वाचे दस्तोेवज आगीत खाक होण्याची दाट शक्यता असते. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यालयात प्राथमिक उपाय म्हणून अग्निशमन यंत्र असावे, असे आदेश दिले होते. हाच धागा पकडून जालना शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रांची काय परिस्थिती आहे? याचा आढावा घेतला असता अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.शहरातील अग्निशमन दल, वन परिक्षेत्र कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल कार्यालय, पोस्ट आॅफीस, नगर परिषद, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, समाजकल्याण कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांची पाहणी केली असता, काही कार्यालयांमध्ये हे अग्निशमन यंत्र धूळ खात पडल्याचे दिसून आले तर काही ठिकाणी केवळ शोभेची वास्तू म्हणून हे यंत्र भिंतीला लटकवण्यात आले होते.ना तपासणी, ना कारवाईहे यंत्र कार्यान्वित आहेत का? त्यांची परिस्थिती कशी आहे? याबाबत तपासणी करण्यास संबंधितांना वेळच नसल्याचे दिसते. त्यामुळे कारवाई करणे तर दूरच. यामुळेच शासकीय कार्यालयातील महत्वाचे दस्तावेज व कागदपत्रे धोक्यात आहेत.वन परिक्षेत्र कार्यालयाने झटकले हातयेथील कार्यालयात अग्निशमन यंत्र नसल्याचे वनक्षेत्र अधिकारी एम.आर.निकुंभ यांनी सांगितले. विशेष म्हणजे आपण मागणी केलेली नाही. यावरून हे कार्यालय आगीबाबत किती जागरूक आहे, हे यावरून स्पष्ट होते. इतरांचीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती.