शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

एनसीएलच्या इंडस मॅजिक लॅबमध्ये आग

By admin | Updated: March 27, 2017 22:33 IST

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) इंडस मॅजिक लॅब नावाच्या इमारतीला सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास आग लागली.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 27 - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) इंडस मॅजिक लॅब नावाच्या इमारतीला सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये इमारतीचे जवळपास ८० टक्के नुकसान झाले असून लॅबमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नसून कोणीही जखमी झालेले नाही. दलाच्या पाच बंबांसह दोन टँकरच्या सहाय्याने ही आग विझवण्यात आल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली. दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनसीएल ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील रासायनिक प्रयोगशाळा आहे. प्रयोगशाळेच्या आवारामध्ये छोट्या मोठ्या लॅबोरेटरी आहेत. इंडस मॅजिक लॅब नावाची इमारत आहे. या इमारतीला आग लागल्याची माहिती दलाला रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी मिळाली होती. तातडीने एक बंब घटनास्थळी रवाना करण्यात आला. परंतु, इमारतीला चारही बाजुंनी आगीने वेढा दिलेला असल्यामुळे आणखी कुमक मागवण्यात आली. दलाचे पाच बंब आणि पाण्याचे दोन टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले. अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, सुनिल गिलबिले यांच्यासह दहा अधिकारी आणि जवळपास ३५ जवानांनी चारही बाजुंनी इमारतीवर पाण्याचा मारा सुरु केला. पाण्याचा मारा करुन अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर थंडाव्याचे काम सुरु करण्यात आले होते. या आगीमध्ये इमारतीचा ८० टक्के भाग जळून खाक झाला आहे. जेव्हा आग लागली तेव्हा इमारतीमध्ये कोणीही नव्हते. काम संपवून सर्वजण बाहेर पडले होते. या लॅबमध्ये विविध रसायने, केमिकल्स, एलपीजी सिलींडर्स होते. परंतु, सुदैवाने कशाचाही स्फोट झाला नाही. इमारतीजवळ परिसरातील कर्मचारी आणि अधिका-यांनी धाव घेत जवानांना मदत केली. ही आग एवढी तीब्र होती की इमारतीमधील लोखंडाचे खांबही वाकले आहेत. या इमारतीशेजारीच अनेक छोट्या मोठ्या लॅब आहेत. शेजारी असलेली बैठी इमारतीतील लॅब वाचवणे जवानांपुढील आव्हान होते. जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणून पुढील अनर्थ टाळला. एनसीएलमध्ये यापुर्वीही अशा प्रकारे आगीच्या दोन - तीन घटना घडलेल्या आहेत. --------------------------ज्या इमारतीला आग लागली होती त्याशेजारी एक बैठी इमारत आहे. या इमारतीमध्ये हायड्रोजन सिलेंडर्स आणि स्फोट होऊ शकतील असे ज्वालाग्रही केमिकल्स होती. दलाच्या जवानांनी जिवाची पर्वा न करता हे सर्व साहित्य विद्युत वेगाने बाहेर काढले. हे सर्व साहित्य सुरक्षित स्थळी हलवल्याने त्याला धग लागू शकली नाही. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. जर या साहित्याला धग लागली असती तर आगीने आणखी रौद्ररुप धारण केले असते. अग्निशामक दलाच्या अधिकारी व जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत मोठा अनथ टाळला.