शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

एनसीएलच्या इंडस मॅजिक लॅबमध्ये आग

By admin | Updated: March 27, 2017 22:33 IST

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) इंडस मॅजिक लॅब नावाच्या इमारतीला सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास आग लागली.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 27 - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) इंडस मॅजिक लॅब नावाच्या इमारतीला सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये इमारतीचे जवळपास ८० टक्के नुकसान झाले असून लॅबमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नसून कोणीही जखमी झालेले नाही. दलाच्या पाच बंबांसह दोन टँकरच्या सहाय्याने ही आग विझवण्यात आल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली. दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनसीएल ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील रासायनिक प्रयोगशाळा आहे. प्रयोगशाळेच्या आवारामध्ये छोट्या मोठ्या लॅबोरेटरी आहेत. इंडस मॅजिक लॅब नावाची इमारत आहे. या इमारतीला आग लागल्याची माहिती दलाला रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी मिळाली होती. तातडीने एक बंब घटनास्थळी रवाना करण्यात आला. परंतु, इमारतीला चारही बाजुंनी आगीने वेढा दिलेला असल्यामुळे आणखी कुमक मागवण्यात आली. दलाचे पाच बंब आणि पाण्याचे दोन टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले. अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, सुनिल गिलबिले यांच्यासह दहा अधिकारी आणि जवळपास ३५ जवानांनी चारही बाजुंनी इमारतीवर पाण्याचा मारा सुरु केला. पाण्याचा मारा करुन अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर थंडाव्याचे काम सुरु करण्यात आले होते. या आगीमध्ये इमारतीचा ८० टक्के भाग जळून खाक झाला आहे. जेव्हा आग लागली तेव्हा इमारतीमध्ये कोणीही नव्हते. काम संपवून सर्वजण बाहेर पडले होते. या लॅबमध्ये विविध रसायने, केमिकल्स, एलपीजी सिलींडर्स होते. परंतु, सुदैवाने कशाचाही स्फोट झाला नाही. इमारतीजवळ परिसरातील कर्मचारी आणि अधिका-यांनी धाव घेत जवानांना मदत केली. ही आग एवढी तीब्र होती की इमारतीमधील लोखंडाचे खांबही वाकले आहेत. या इमारतीशेजारीच अनेक छोट्या मोठ्या लॅब आहेत. शेजारी असलेली बैठी इमारतीतील लॅब वाचवणे जवानांपुढील आव्हान होते. जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणून पुढील अनर्थ टाळला. एनसीएलमध्ये यापुर्वीही अशा प्रकारे आगीच्या दोन - तीन घटना घडलेल्या आहेत. --------------------------ज्या इमारतीला आग लागली होती त्याशेजारी एक बैठी इमारत आहे. या इमारतीमध्ये हायड्रोजन सिलेंडर्स आणि स्फोट होऊ शकतील असे ज्वालाग्रही केमिकल्स होती. दलाच्या जवानांनी जिवाची पर्वा न करता हे सर्व साहित्य विद्युत वेगाने बाहेर काढले. हे सर्व साहित्य सुरक्षित स्थळी हलवल्याने त्याला धग लागू शकली नाही. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. जर या साहित्याला धग लागली असती तर आगीने आणखी रौद्ररुप धारण केले असते. अग्निशामक दलाच्या अधिकारी व जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत मोठा अनथ टाळला.