शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

प्रशासकीय कार्यालयांमधील अग्निरोधक यंत्र ‘आउटडेटेड’!

By admin | Updated: July 8, 2016 00:23 IST

२0१२ पासून अग्निरोधक यंत्रात ‘रिफिलिंग’च नसल्यामुळे आगीचा धोका कायम.

सुनील काकडे / वाशिमविविध कारणांमुळे लागणारी आग वेळीच आटोक्यात यावी, यासाठी प्रशासकीय कार्यालये, शासकीय वसतिगृहे, सिनेमा हॉल्स यासह इतर सार्वजनिक स्थळी अग्निरोधक यंत्रे बसविण्यात आली; मात्र सन २0१२ पासून या यंत्रांची 'रिफिलिंग' झाली नसल्याचे विदारक वास्तव असून प्रशासकीय कारभारातील गलथानपणा यामुळे चव्हाट्यावर आला आहे.राज्याच्या कारभाराचा गाडा जेथून हाकला जातो, त्या मुंबईच्या मंत्रालयात २१ जून २0१२ मध्ये भीषण आग लागली होती. त्यात चौथा, पाचवा आणि सहावा मजला पूर्णत: जळून खाक होण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या फाइल्स बेचिराख झाल्या होत्या. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून राज्य शासनाने सर्व जिल्हय़ांमधील प्रशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, रेल्वेस्थानक, बसस्थानक, दवाखाने यासह नागरिकांची सदोदित गर्दी असणार्‍या इतर ठिकाणी अग्निरोधक यंत्रे बसवून देखभाल, दुरुस्तीकडे वेळोवेळी लक्ष पुरविणे गरजेचे होते; मात्र अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमधील एकाही प्रशासकीय कार्यालयात आगीच्या घटनांपासून बचावाकरिता कुठलीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. काही प्रशासकीय कार्यालयांमध्ये ड्राय पावडर टाइप फायर एक्सटिंग्युशर बसविण्यात आले; मात्र सन २0१२ पासून या यंत्रांची ह्यरिफिलिंगह्ण झालेली नाही. ४ वर्षांचा मोठा कालावधी उलटूनही या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आगीचा धोका कायम लागून असल्याचे चित्र आहे. शासकीय निवासस्थानांमध्ये ९ वर्षांपासून रिफिलिंगला कोलदांडा!वाशिम येथील शासकीय निवासस्थानांमध्ये सन २00७ मध्ये फायर एक्सटिंग्युशर बसविण्यात आले; मात्र तेव्हापासून आजतागायत ९ वर्षांच्या मोठय़ा काळादरम्यान या यंत्रांची रिफिलिंगच झाली नाहीत. यासह समाजकल्याण विभागांतर्गत चालविल्या जाणार्‍या शासकीय वसतिगृहांमध्येही असाच प्रकार आढळून आल्याने ही ठिकाणेदेखील संभाव्य धोक्याच्या वतरुळात अडकलेली आहेत.