शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
6
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
7
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
8
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
9
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
10
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
11
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
12
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
13
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
14
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
15
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
16
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
17
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
18
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
19
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
20
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण

रत्नागिरी आगारातील रोकड विभागाला आग

By admin | Updated: December 26, 2015 00:01 IST

पाच लाखांचे नुकसान : ११४ तिकीट यंत्रे बाद; १९० फेऱ्या ठप्प, मशीनअभावी दीड लाखाचे नुकसान

रत्नागिरी : रत्नागिरी विभागीय कार्यालयातील रोकड विभागाला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. या आगीत तिकीट यंत्रे (इटीएम- इलेक्ट्रॉनिक तिकिटींग मशीन), चार्जर, वे बिल गठ्ठा, तिकीट रोल भस्मसात झाले आहेत. ११४ तिकीट यंत्रे बाद झाली असून, मशीनअभावी दीड लाखाचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे शुक्रवारी सकाळच्या सत्रात तब्बल १९0 बसफेऱ्या ठप्प झाल्या.राज्य परिवहन महामंडळाच्या माळनाका येथील रत्नागिरी विभागीय कार्यालयाच्या मुख्य इमारतीच्या मागे असलेल्या रोकड विभागाच्या इमारतीतून धूर येत असल्याचे गुरुवारी मध्यरात्री ३.१५ वाजता सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. नगरपालिकेचा अग्निशमन बंब पाचारण करण्यात आला. त्याद्वारे आग विझविण्यात आली.गेली दोन वर्षे तिकीट ट्रेचा वापर बंद आहे. ग्राहकांना तिकीट यंत्राद्वारे तिकिटे देण्यात येतात. या यंत्रांना बॅटरीज् असल्याने ते चार्जिंगला लावण्यात येतात. आगारात २२३ यंत्रे आहेत. त्यापैकी ११४ यंत्रे चार्जिंगला लावण्यात आली होती. ती या आगीत बाद झाली आहेत. शिवाय चार्जर बॉक्स, शेजारी असलेले वे बिल गठ्ठे, तिकीट रोल जळाले आहेत. त्यामुळे महामंडळाचे एकूण पाच लाखांचे नुकसान झाले आहे. तिकीट यंत्रे नसल्यामुळे सकाळी ४.३० वाजल्यापासून ड्युटीवर हजर असलेल्या चालक-वाहकांना बसून रहावे लागले. सकाळी ६.३० वाजता एक संगणक रत्नागिरी आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात सुरू करण्यात आला. संगणकाद्वारे अपडेट घेऊन वाहकांना तिकीट ट्रे देण्यात आले. त्यानंतर एकेक फेऱ्या सुरू करण्यात आल्या. सकाळी ६.३० वाजता बोरीवली, पुणे गाड्या सोडण्यात आल्या. सकाळी लांब पल्ल्याच्या, तालुक्यातून आलेल्या गाड्या रत्नागिरी आगारात दाखल झाल्यानंतर ती तिकीट यंत्रे वापरासाठी घेण्यात आली. तिकीट यंत्रांअभावी रत्नागिरी ग्रामीण, शहरी मार्गावरील फेऱ्या बंद होत्या. सकाळच्या सत्रात १९० फेऱ्या न गेल्यामुळे ४ हजार ४४० किलोमीटरच्या फेऱ्या रद्द झाल्या. परिणामी महामंडळाचे दीड लाखाचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)ड्युटीवर असूनही गैरहजेरीवाहक, चालक नेहमीप्रमाणे सकाळपासून ड्युटीवर हजर होते. मात्र तिकीट यंत्रे बाद झाल्यामुळे व तिकीट ट्रे उपलब्ध नसल्यामुळे वाहक, चालकांना बसून रहावे लागले. संगणकावर तिकीट ट्रेचे अपडेट घेऊन तिकीट ट्रे वाहकांच्या ताब्यात देण्यात येत होते. परंतु फेऱ्या जाऊ न शकलेल्या चालक, वाहकांची हजेरी प्रशासनाकडून लावून घेण्यात असमर्थता दर्शविण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. कर्मचाऱ्यांची चुकी नसताना अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून उमटत होत्या. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे रत्नागिरी आगार सचिव बी. ए. विश्वासराव यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन हजेरी लावण्याची विनंती केली आहे.चार्जींगला लावून ठेवण्यात आलेली तिकीट यंत्रे जळून खाक झाली.आगीचे कारण गुलदस्त्यातशॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याबाबत एस्. टी.चे अधिकारी चौकशी करीत आहेत.