शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

फेसबुकवर दिशाभूल करणारी पोस्ट टाकणाऱ्यावर एफआयआर

By admin | Updated: February 17, 2017 02:40 IST

राज्य सरकारच्या गोवंश हत्याबंदीच्या निर्णयानंतर चामड्याची बॅग घेऊन प्रवास करत असताना एका रिक्षाचालकाने मारहाण केल्याची तक्रार

मुंबई : राज्य सरकारच्या गोवंश हत्याबंदीच्या निर्णयानंतर चामड्याची बॅग घेऊन प्रवास करत असताना एका रिक्षाचालकाने मारहाण केल्याची तक्रार करणाऱ्या मुलाविरुद्धच पोलिसांनी फेसबुकवर दिशाभूल करणारी पोस्ट टाकल्याबद्दल एफआयआर नोंदवला. मात्र त्याच्यावर नोंदवलेल्या गुन्ह्यात तथ्य नसल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.सरकारने गोवंश हत्याबंदीचा निर्णय घेतल्यानंतर चामड्याची बॅग बाळगल्याबद्दल एका रिक्षाचालकाने आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार बरुन कश्यप भुयान याने पोलिसांकडे केली. त्यानंतर त्याने तशी पोस्टही फेसबुकवर टाकली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवर पुढील तपास केला असता या तक्रारीत तथ्य नसल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे पोलिसांनी फेसबुकवर लोकांची दिशाभूल करणारी पोस्ट टाकल्याने बरुनवरच भारतीय दंडसंहिता कलम १५३ (अ) (समाजामध्ये तणाव निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला. तसेच सरकारी यंत्रणेला नाहक त्रास दिल्याबद्दल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासही सुरुवात केली. एफआयआर व कायदेशीर कारवाई रद्द करण्यात यावी, यासाठी बरुनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.याचिकाकर्त्याविरुद्ध आयपीसी कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने पोलिसांना पुढील कारवाई न करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)