शहरं
Join us  
Trending Stories
1
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
2
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
3
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
4
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
5
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
6
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
7
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
8
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
9
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
10
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
11
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
12
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
13
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
14
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
15
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
16
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
17
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
18
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
19
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
20
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉटूलिझम विषबाधेवर उपाय सापडेना

By admin | Updated: February 9, 2016 02:12 IST

साकडबाव पठारावर शेतीउपयोगी ३० जनावरे बॉटूलिझम विषबाधेने मृत पावल्याने शेतकरी चिंतेत असून त्यांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. या विषबाधेवर रामबाण उपाय सापडत नसल्याने

- रवींद्र सोनावळे , शेणवासाकडबाव पठारावर शेतीउपयोगी ३० जनावरे बॉटूलिझम विषबाधेने मृत पावल्याने शेतकरी चिंतेत असून त्यांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. या विषबाधेवर रामबाण उपाय सापडत नसल्याने पशुधन अधिकारी हताश झाले आहेत.शहापूर तालुक्यातील साकडबाव पठारावर सलग तिसऱ्या वर्षी बॉटूलिझम विषबाधेने थैमान घातले आहे. जनावरांमध्ये क्षरांची कमतरता, पुरेसा खुराक नसणे, मयत जनावरे उघड्यावर टाकणे, कुजलेल्या हाडातील व पालापाचोळ्यातील बॉटूलिझम विष मोकाट जनावरांनी खाणे, कुजलेले आंबे खाणे, पुरेसे पोटभर पाणी न मिळणे, ही या विषबाधेची मूळ कारणे असून गुरांचे पायबळ जाणे, ताकद कमी होणे, शेपटी लुळी पडणे, चालता न येणे, उठता न येणे, भूक मंदावणे, लाळ सांडणे, अंग गार पडणे, पाय व शेपटीला सुई टोचल्यास वेदना न होणे, ही विषबाधेची लक्षणे आहेत. या विषबाधेने २०१३-१४ मध्ये चिलरवाडीतील ८८ जनावरे मृत पावली होती. संबंधित शेतकऱ्यांना आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत न्युकलियास बजेटमधून बैल- सात हजार, गाय- पाच हजार व वासरू- दोन हजार याप्रमाणे अर्थसाहाय्य केले होते. तसेच २०१४-१५ साली चिंद्याचीवाडी येथील ४० जनावरे मृत पावली आहेत. त्यांना अजूनही भरपाई मिळाली नसून १५ डिसेंबर २०१५ ते ७ फेब्रुवारी २०१६ या दोन महिन्यांत लाख्याचीवाडी, मधलीवाडी व रानविहीर येथील यशवंत लाखे ९, विठ्ठल लाखे ५, मंगल भामरे ४, संजय भारमर १, मनोहर लाखे १ , नवसू भगत २, सुभाष शिरकंडे २, तुकाराम बरतड १, विठ्ठल मुंढे १, हिरामण लाखे २, जयराम मेंगाल १, शंकर भगत १ या १२ आदिवासी शेतकऱ्यांची ३० जनावरे मृत पावली आहेत. यातील १६ जनावरांचे पोस्टमार्टम करून त्यांचे नमुने चौकशीसाठी पुणे येथील पशुरोग अन्वेषण विभागाकडे पाठविले आहेत. या प्रकारच्या विषबाधेवर कोणतीही लस अथवा औषधोपचार उपलब्ध नसल्याने उपचाराविना लागण झालेली जनावरे १२ तासांच्या आत मृत पावतात. - डॉ .ए.पी. पाटील, पशुधन विकास अधिकारी, पं.स. शहापूर