शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

ओळख शोधते मी...अंधारात राहुनी चांदणे शोधते...

By admin | Updated: August 2, 2016 03:55 IST

‘कुठुनी आणला दगड देवमूर्ती घडवायला’, ‘असेच हे चांदणे डुबले’, ‘ओळख शोधते मी, ओळख शोधते,

ठाणे : ‘कुठुनी आणला दगड देवमूर्ती घडवायला’, ‘असेच हे चांदणे डुबले’, ‘ओळख शोधते मी, ओळख शोधते, अंधारात राहुनी चांदणे शोधते’ या कविता कोणा प्रसिद्ध कवीच्या नाहीत किंवा कोणत्या कवीसंमेलनात सादर झालेल्या नाहीत; तर त्या आहेत मनोरुग्णांच्या लेखणीतून उतरलेल्या. प्रादेशिक मनोरुग्णालयातील दोन महिला मनोरुग्णांनी कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. व्यक्त होण्यासाठी कोणी जवळची व्यक्ती नाही, ना कोणी बोलायला. त्यामुळे आपले सुख-दु:ख, वेदना, आपुलकी, एकाकीपण सारं सारं काही त्या कवितांतून व्यक्त करीत आहेत. यातील एक महिला नालासोपाऱ्याची, तर एक ठाण्याची आहे. एकीला संतापाने मानसिक आजार झाला; तर दुसरीला आई-वडिलांत वारंवार होणाऱ्या कलहामुळे. दोघींनी मात्र आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आधार घेतला आणि त्यांच्या छानशा कविता त्यांच्या शब्दांतून फुलून आल्या. मनोरुग्णालयात असतानाही त्यांनी अनेक कविता लिहील्या आहेत आणि त्यांचे कविमन जपण्याचे काम प्रादेशिक मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचारतज्ज्ञ करीत आहेत. नालासोपाऱ्याला राहणारी महिला एक वर्षाची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आईने धुणी-भांड्याची कामे करण्यास सुरूवात केली. ती आजी आणि मावशीसोबत गावी राहत होती. शिक्षणही तिथेच घेतले. सातवीला असल्यापासून तिच्यात कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली. ती शिक्षकांमुळे निर्माण झाल्याचे ती सांगते. मात्र वयाच्या १८ व्या वर्षी तिच्यातील आजाराला सुरूवात झाली आणि त्यावेळी कोणी लक्ष न दिल्याने तो वाढत गेला. सुरूवातीला कानात आवाज ऐकू यायचे. मग चिडचिड व्हायची. खूप संताप यायचा. लग्नानंतर हा त्रास वाढत गेला. जेव्हा मी शांत असे, तेव्हा मात्र कविता लिहीत बसे, असे ती सांगते. दीड वर्षांपूर्वी ती उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल झाली. सहा महिन्यांत ती दोनदा दाखल झाल्याचे तेथील व्यवसायउपचार तज्ज्ञांनी सांगितले. तिला निसर्ग, व्यक्तिमत्त्व, सण आदी विषयांवर कविता लिहायला आवडतात. जवळपास १०० कविता लिहील्याचे ती सांगते. श्रावण, वटपौर्णिमा, बहरलेला निसर्ग, सुख-दु:खाची व्याख्या, इंद्रधनुष्य अशा विविध विषयांवर कविता लिहिल्या आहेत. तिला त्याचे पुस्तक काढण्याची फार इच्छा आहे.ठाण्यातील महिला रुग्णाने सांगितले, माझे बालपण चांगल्या वातावरणात झाले नाही. वडिलही लक्ष देत नव्हते. आठवीत असताना आई गेली. त्यामुळे मला एकाकी वाटायचे. मग मी लिहू लागले आणि त्यातून कवीमनाचा जन्म झाला. सुरूवातीला प्रेरणा देणारी ‘जीवन हे सुंदर जगता आले पाहिजे,’ ही कविता लिहिली आणि त्यानंतर भावना व्यक्त करण्यासाठी लिहित गेले. कलेची मला पहिल्यापासून आवड आहे, असे ती सांगते. ‘आसवांची रात्र’, ‘बंधन’, ‘लाचार’ यासारख्या जवळपास २५ कविता तिने शब्दबद्ध केल्या आहेत. इथे आल्यावर तीन - चार कविता लिहिल्याचे ती सांगते. (प्रतिनिधी)>कलागुण फुलविणे हा हेतूव्यवसाय उपचार केंद्रात रुग्णाच्या क्षमतेचा उपयोग विविध अॅिक्टव्हिटीसाठी केला जातो. त्यातून ते व्यक्त होतात. त्याच्यातील कलागुण फुलतात. या दोघींनी आम्हाला कविता सुचतात, असे सांगितले. मग त्यांना वही दिली आणि त्यातून त्यांनी कविता लिहिण्यास सुरूवात केली. - रुपा किणकर, व्यवसाय उपचार तज्ज्ञ, प्रादेशिक मनोरुग्णालय