शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओळख शोधते मी...अंधारात राहुनी चांदणे शोधते...

By admin | Updated: August 2, 2016 03:55 IST

‘कुठुनी आणला दगड देवमूर्ती घडवायला’, ‘असेच हे चांदणे डुबले’, ‘ओळख शोधते मी, ओळख शोधते,

ठाणे : ‘कुठुनी आणला दगड देवमूर्ती घडवायला’, ‘असेच हे चांदणे डुबले’, ‘ओळख शोधते मी, ओळख शोधते, अंधारात राहुनी चांदणे शोधते’ या कविता कोणा प्रसिद्ध कवीच्या नाहीत किंवा कोणत्या कवीसंमेलनात सादर झालेल्या नाहीत; तर त्या आहेत मनोरुग्णांच्या लेखणीतून उतरलेल्या. प्रादेशिक मनोरुग्णालयातील दोन महिला मनोरुग्णांनी कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. व्यक्त होण्यासाठी कोणी जवळची व्यक्ती नाही, ना कोणी बोलायला. त्यामुळे आपले सुख-दु:ख, वेदना, आपुलकी, एकाकीपण सारं सारं काही त्या कवितांतून व्यक्त करीत आहेत. यातील एक महिला नालासोपाऱ्याची, तर एक ठाण्याची आहे. एकीला संतापाने मानसिक आजार झाला; तर दुसरीला आई-वडिलांत वारंवार होणाऱ्या कलहामुळे. दोघींनी मात्र आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आधार घेतला आणि त्यांच्या छानशा कविता त्यांच्या शब्दांतून फुलून आल्या. मनोरुग्णालयात असतानाही त्यांनी अनेक कविता लिहील्या आहेत आणि त्यांचे कविमन जपण्याचे काम प्रादेशिक मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचारतज्ज्ञ करीत आहेत. नालासोपाऱ्याला राहणारी महिला एक वर्षाची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आईने धुणी-भांड्याची कामे करण्यास सुरूवात केली. ती आजी आणि मावशीसोबत गावी राहत होती. शिक्षणही तिथेच घेतले. सातवीला असल्यापासून तिच्यात कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली. ती शिक्षकांमुळे निर्माण झाल्याचे ती सांगते. मात्र वयाच्या १८ व्या वर्षी तिच्यातील आजाराला सुरूवात झाली आणि त्यावेळी कोणी लक्ष न दिल्याने तो वाढत गेला. सुरूवातीला कानात आवाज ऐकू यायचे. मग चिडचिड व्हायची. खूप संताप यायचा. लग्नानंतर हा त्रास वाढत गेला. जेव्हा मी शांत असे, तेव्हा मात्र कविता लिहीत बसे, असे ती सांगते. दीड वर्षांपूर्वी ती उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल झाली. सहा महिन्यांत ती दोनदा दाखल झाल्याचे तेथील व्यवसायउपचार तज्ज्ञांनी सांगितले. तिला निसर्ग, व्यक्तिमत्त्व, सण आदी विषयांवर कविता लिहायला आवडतात. जवळपास १०० कविता लिहील्याचे ती सांगते. श्रावण, वटपौर्णिमा, बहरलेला निसर्ग, सुख-दु:खाची व्याख्या, इंद्रधनुष्य अशा विविध विषयांवर कविता लिहिल्या आहेत. तिला त्याचे पुस्तक काढण्याची फार इच्छा आहे.ठाण्यातील महिला रुग्णाने सांगितले, माझे बालपण चांगल्या वातावरणात झाले नाही. वडिलही लक्ष देत नव्हते. आठवीत असताना आई गेली. त्यामुळे मला एकाकी वाटायचे. मग मी लिहू लागले आणि त्यातून कवीमनाचा जन्म झाला. सुरूवातीला प्रेरणा देणारी ‘जीवन हे सुंदर जगता आले पाहिजे,’ ही कविता लिहिली आणि त्यानंतर भावना व्यक्त करण्यासाठी लिहित गेले. कलेची मला पहिल्यापासून आवड आहे, असे ती सांगते. ‘आसवांची रात्र’, ‘बंधन’, ‘लाचार’ यासारख्या जवळपास २५ कविता तिने शब्दबद्ध केल्या आहेत. इथे आल्यावर तीन - चार कविता लिहिल्याचे ती सांगते. (प्रतिनिधी)>कलागुण फुलविणे हा हेतूव्यवसाय उपचार केंद्रात रुग्णाच्या क्षमतेचा उपयोग विविध अॅिक्टव्हिटीसाठी केला जातो. त्यातून ते व्यक्त होतात. त्याच्यातील कलागुण फुलतात. या दोघींनी आम्हाला कविता सुचतात, असे सांगितले. मग त्यांना वही दिली आणि त्यातून त्यांनी कविता लिहिण्यास सुरूवात केली. - रुपा किणकर, व्यवसाय उपचार तज्ज्ञ, प्रादेशिक मनोरुग्णालय