शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

नेमके काय चुकले याचा शोध घ्या

By admin | Updated: March 2, 2017 01:52 IST

गडबड केलेली असावी, तर कोणी मोदी लाट अद्याप संपली नाही असे म्हणू लागले आहेत.

रहाटणी : कोणी म्हणते, मतदान यंत्रात काही तरी गडबड केलेली असावी, तर कोणी मोदी लाट अद्याप संपली नाही असे म्हणू लागले आहेत. कोणी नवमतदारांचा वाढलेला मतांचा टक्का भाजपाच्या पथ्यावर पडला आहे, असा निष्कर्ष काढू लागले आहेत. तर कोणाच्या मते महापालिकेत राष्ट्रवादीच्या पराभवास गाफीलपणा नडला. महापालिकेतील सत्तांतराची अशी कारणमीमांसा होत असताना राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले नेमके काय चुकले, याचा शोध घ्यावा अशी जाणीव मतदारांनीच निवडणुकीनंतर ठिकठिकाणी सुरू असलेल्या चर्चेद्वारे दिली आहे. गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्र्रेस पक्षाचे ८१ नगरसेवक निवडून आले होते. तसेच राष्ट्रवादीला संलग्न असलेले ११ अपक्ष नगरसेवक होते. बहुमताच्या जोरावर १५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासकामांचा डोंगर उभा केला होता. याच विकासकामांचे भांडवल निवडणुकीत कामी येईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला होती. असे असताना राष्ट्रवादीला या निवडणुकीत केवळ ३६ जागा मिळाल्या; तर अवघे ३ नगरसेवक असे पक्षीय बल असलेल्या भाजपाने या निवडणुकीत महापालिकेत तब्बल ७७ नगरसेवक निवडून आणले. शहरातील नागरिकांनी मताचा कौल भाजपाच्या बाजूने का दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)>कट्टर विरोधकांनी घेतली एकमेकांची गळाभेटलोकसभा, विधानसभा आणि नुकतीच झालेली महापालिका निवडणूक अशा प्रत्येक टप्प्यावर शहरवासीयांनी येथील राजकारण जवळून पाहिले आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक, प्रतिस्पर्धी ऐनवेळी एकत्र येतात. स्वार्थासाठी पक्षनिष्ठा, विचारधारा या तत्त्वांना तिलांजली दिली जाते. वर्षानुवर्षाचे कट्टर विरोधक असलेले एकमेकांची गळाभेट घेतात. बंडखोरांनाही सन्मान मिळतो. याचा प्रत्यक्ष अनुभव गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडमधील मतदारांना आला आहे. कोलांटउड्या कोणी, कशा मारायच्या त्या मारू द्यात, सर्वजण ज्या ठिकाणी एकत्र येतील,त्याकडे मतदारांनी लक्ष केंद्रित केले.>राजकीय चर्चेला अर्थ नाहीऐनवेळी पक्षांतर करणारे, एकमेकांवर आरोप करणारे सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत. त्यांच्यात फरक काहीच नाही, हे मतदारांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी मतांचा कौल दिला. हे लक्षात घेतले, तर बाकी राजकीय चर्चेला काही अर्थच नाही, असा निष्कर्ष काही जाणकारांच्या चर्चेतून निघाला आहे.