शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

नेमके काय चुकले याचा शोध घ्या

By admin | Updated: March 2, 2017 01:52 IST

गडबड केलेली असावी, तर कोणी मोदी लाट अद्याप संपली नाही असे म्हणू लागले आहेत.

रहाटणी : कोणी म्हणते, मतदान यंत्रात काही तरी गडबड केलेली असावी, तर कोणी मोदी लाट अद्याप संपली नाही असे म्हणू लागले आहेत. कोणी नवमतदारांचा वाढलेला मतांचा टक्का भाजपाच्या पथ्यावर पडला आहे, असा निष्कर्ष काढू लागले आहेत. तर कोणाच्या मते महापालिकेत राष्ट्रवादीच्या पराभवास गाफीलपणा नडला. महापालिकेतील सत्तांतराची अशी कारणमीमांसा होत असताना राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले नेमके काय चुकले, याचा शोध घ्यावा अशी जाणीव मतदारांनीच निवडणुकीनंतर ठिकठिकाणी सुरू असलेल्या चर्चेद्वारे दिली आहे. गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्र्रेस पक्षाचे ८१ नगरसेवक निवडून आले होते. तसेच राष्ट्रवादीला संलग्न असलेले ११ अपक्ष नगरसेवक होते. बहुमताच्या जोरावर १५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासकामांचा डोंगर उभा केला होता. याच विकासकामांचे भांडवल निवडणुकीत कामी येईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला होती. असे असताना राष्ट्रवादीला या निवडणुकीत केवळ ३६ जागा मिळाल्या; तर अवघे ३ नगरसेवक असे पक्षीय बल असलेल्या भाजपाने या निवडणुकीत महापालिकेत तब्बल ७७ नगरसेवक निवडून आणले. शहरातील नागरिकांनी मताचा कौल भाजपाच्या बाजूने का दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)>कट्टर विरोधकांनी घेतली एकमेकांची गळाभेटलोकसभा, विधानसभा आणि नुकतीच झालेली महापालिका निवडणूक अशा प्रत्येक टप्प्यावर शहरवासीयांनी येथील राजकारण जवळून पाहिले आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक, प्रतिस्पर्धी ऐनवेळी एकत्र येतात. स्वार्थासाठी पक्षनिष्ठा, विचारधारा या तत्त्वांना तिलांजली दिली जाते. वर्षानुवर्षाचे कट्टर विरोधक असलेले एकमेकांची गळाभेट घेतात. बंडखोरांनाही सन्मान मिळतो. याचा प्रत्यक्ष अनुभव गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडमधील मतदारांना आला आहे. कोलांटउड्या कोणी, कशा मारायच्या त्या मारू द्यात, सर्वजण ज्या ठिकाणी एकत्र येतील,त्याकडे मतदारांनी लक्ष केंद्रित केले.>राजकीय चर्चेला अर्थ नाहीऐनवेळी पक्षांतर करणारे, एकमेकांवर आरोप करणारे सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत. त्यांच्यात फरक काहीच नाही, हे मतदारांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी मतांचा कौल दिला. हे लक्षात घेतले, तर बाकी राजकीय चर्चेला काही अर्थच नाही, असा निष्कर्ष काही जाणकारांच्या चर्चेतून निघाला आहे.