शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

गणित सोपे करण्यासाठी नव्या गमतीजमती शोधून काढा

By admin | Updated: January 23, 2017 04:40 IST

गणित विषय म्हटला की, अनेकांना त्यांच्या काठिण्य पातळीमुळे भीती वाटते. परंतु ज्या पद्धतीने विज्ञान विषय सोपा करून सांगण्यासाठी

मुंबई : गणित विषय म्हटला की, अनेकांना त्यांच्या काठिण्य पातळीमुळे भीती वाटते. परंतु ज्या पद्धतीने विज्ञान विषय सोपा करून सांगण्यासाठी सोप्या पद्धतीचा अवलंब वैज्ञानिकांनी केला आहे. अगदी त्याच पद्धतीने गणित विषय सोपा करून सांगण्यासाठी गणितातील गमतीजमती शोधून काढायला हव्यात; तरच हा विषय विद्यार्थ्यांपर्यंत अधिक सोप्या पद्धतीने पोहोचेल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांनी दादर येथील कार्यक्रमात मांडले.साहित्य अकादमीतर्फे ‘लेखक भेट’ या कार्यक्रमाचे आयोजन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात करण्यात आले होेते. या वेळी नारळीकर बोलत होेते. साहित्याशी जुळलेल्या नात्याविषयी ते म्हणाले की, खरंतर एका अपघातामुळेच माझे पुस्तकाशी नाते जुळले. शिवाय आई ज्या गोष्टी सांगायची त्यातून साहित्याची गोडी निर्माण झाली; आणि विज्ञानाची आवड असल्यामुळे वैज्ञानिक साहित्याकडे वळलो. विज्ञान साहित्याविषयी ते म्हणाले की, विज्ञान साहित्याला अधिक झळाळी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्य संमेलन आणि साहित्यविषयक होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांमधून ‘विज्ञान’ विषयावर चर्चा व्हायला हवी. तरच विज्ञान विषयातील साहित्यनिर्मितीला अधिक चालना मिळेल. विज्ञान विषयातील अनेक प्रश्नांवर या वेळी चर्चा करण्यात आली. ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वीतलावरील पाण्याचा साठा, बदलते हवामान याविषयीच्या शंका नारळीकरांनी दूर केल्या. याप्रसंगी साहित्य अकादमीचे कृष्णा किंभवने, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)