शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

‘कारागृहासाठी तातडीने जागा शोधा’

By admin | Updated: March 2, 2017 05:39 IST

वाढत्या लोकसंख्येमुळे व अन्य कारणांमुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे.

मुंबई : वाढत्या लोकसंख्येमुळे व अन्य कारणांमुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. त्यामानाने अस्तित्वात असलेल्या कारागृहांची क्षमता अत्यंत कमी आहे. सध्या आर्थर रोड कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट आरोपी व कैदी ठेवण्यात आले आहेत. हीच स्थिती पुण्याच्या येरवडा कारागृहाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई व पुण्यात अतिरिक्त कारागृह बांधण्यासाठी येत्या तीन महिन्यात सरकारी भूखंड शोधावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.जनआंदोलन या एनजीओने अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांच्यातर्फे उच्च न्यायालयात येरवडा कारागृहासंबंधी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर बुधवारी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने निकाल दिला.शहरात कारागृह नसणे ही स्थिती अगदी आदर्श स्थिती आहे पण आपण एवढ्या आदर्शवादी जगात राहात नाही. वाढती लोकसंख्या आणि अन्य बाबींमुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. या शहरांतील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी, आरोपी भरण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने पुढील २५-३० वर्षांचा विचार करून या दोन्ही शहरांत अतिरिक्त कारागृहे बांधण्यासाठी सरकारी जागा शोधणे आवश्यक आहे, असे खंडपीठाने म्हटले. सध्या नवीन कारागृहे उपलब्ध करणे शक्य नसल्याने उच्च न्यायालयाने तोपर्यंत अस्तित्वात असलेल्या कारागृहांमध्ये वाढीव बांधकाम करणे शक्य आहे का? याचीही चाचपणी करण्यास सांगितले आहे. राज्यातील सर्व कारागृहांमधील कैद्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा तपासण्यासाठी काही एनजीओ व आहारतज्ज्ञांची समिती नेमण्याचे निर्देशही सरकारला दिले. (प्रतिनिधी)